मुंबई : बाबरी मशिद पाडली होती, तेव्हा महाराष्ट्रातील एकही शिवसेनेचा नेता गेला होता का ? असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला केला. बाबरी मशिदी पाडली होती तेव्हा 32 आरोपी होते. त्यात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंग, उमा भारती इत्यादी होते. बाबरी मशिदच्या ढाच्या पाडल्यामुळे 30 वर्ष आरोप सहन केलं. मागील 32 वर्षात महाराष्ट्रातील कुठलाच नेता बघायला मिळत नाही.
बाबरी मशिदीचा ढाच्या पाडणारे कार सेवक होते. त्यावेळी त्यांनी कल्याण सिंग यांचा देखील उल्लेख केला. ते कल्याण सिंग होते. त्यांनी आपलं सरकार त्यासाठी सोडून दिलं आणि तुम्ही रामाचा खरचं त्याठिकाणी जन्म झाला होता का ? असा सवाल ज्यांनी विचारला. त्यांच्या मांडीला माडी लावून बसले आहे. महाराष्ट्रामध्ये हनुमान चालिसा म्हटली तर राग येतो. राणा दाम्पत्यांनी मला सांगितलं असतं तर त्यांना माझ्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणायला लावली असती. परंतु मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणायचं म्हटलं तर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला, असंही ते म्हणाले.
हनुमान चालिसा म्हटल्याने रामाचं राज्य उलटलं जाईल की रावणाचं ? असा सवाल देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. एकदा मला सांगा की तुम्ही रामाच्या बाजूने आहेत की रावणाच्या. असंही ते म्हणाले. मागील काही दिवसापासून भाजपकडून भ्रष्टाचार उघड करण्यासाठी पोलखोल सभेचं आयोजन करण्यात आलं. भाजपच्या अनेक नेत्यांनी मुंबईत ठिकठिकाणी सभा घेत शिवसेनेवर निशाणा साधला. मुंबई पालिकेतील भ्रष्टाचार उघड कऱण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेविरोधात जोरदार आक्रमक भूमिका घेतली होती. अशातच पोलखोल यात्रेत दगडफेक देखील करण्यात आली होती.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत बुस्टर डोस सभा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद याठिकाणी सभा तर महाराष्ट्र दिना निमित्त शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित कार्यक्रम होत आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.