मुंबई : काही लोकांचा गैरसमज आहे की, त्यांचा अवमान म्हणजे महाराष्ट्राचा अवमान आहे. त्यांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान आहे. पंरतु आज हे पण सांगण्याची वेळ आली आहे की तुम्ही फक्त हिंदुत्व नाही. पंरतु हे मी म्हणणार नाही, कारण मला हिंदुची संख्या कमी करायची नाही. हिंदुत्व अशी पद्धत आहे. ज्या पद्धतीच्या माध्यमातून या जगातील प्रत्येक व्यक्तीला जीवनाचा मार्ग दाखवला. हे खरं हिंदुत्व आहे, हे लक्षात ठेवा असा टोला देखील त्यांनी लगावला.
ज्यावेळी तुम्ही भ्रष्टाचार, दुराचार करता. त्यावेळी तुमचे साथी संवगडी तुरूंगात जातात. त्यावेळी महाराष्ट्र बदनाम होतो. त्यामुळे या महाराष्ट्राचं नाव संपुर्ण महाराष्ट्रात बदनाम होत आहे. त्यामुळे तुम्हाला शरम वाटली पाहिजे, महाराष्ट्राच्या नावाला बट्टा लावलायचं काम करताहेत. हेच काम महाविकास आघाडी सरकारमध्ये होताना दिसत आहे. बाबरी मशिद पाडली तेव्हा कुठल्या बिळात होते. मशिदीवरील भोंगे काढायला लावले तेव्हा हातभर फाटली, अन् हेच सांगता आम्ही बाबरी मशिदी पाडली. असा टोला देखील त्यांनी लगावला.
मागील काही दिवसापासून भाजपकडून भ्रष्टाचार उघड करण्यासाठी पोलखोल सभेचं आयोजन करण्यात आलं. भाजपच्या अनेक नेत्यांनी मुंबईत ठिकठिकाणी सभा घेत शिवसेनेवर निशाणा साधला. मुंबई पालिकेतील भ्रष्टाचार उघड कऱण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेविरोधात जोरदार आक्रमक भूमिका घेतली होती. अशातच पोलखोल यात्रेत दगडफेक देखील करण्यात आली होती.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत बुस्टर डोस सभा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद याठिकाणी सभा तर महाराष्ट्र दिना निमित्त शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित कार्यक्रम होत आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.