दीपोत्सवाचे पर्व साजरे होत असताना आपला बळीराजा मात्र मदतीविना संकटात आहे. त्याची दिवाळी या सरकारने अंधारातच ठेवली, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करणारे आमदार रवी राणा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. या सर्वांना दिवाळीच्या दिवशी कारागृहातच रहावे. यावरून फडणवीसांनी सरकारवर टीका केली आहे.
बळीराजा संकटात असताना त्याची दिवाळी अंधारात जाऊ नये, यासाठी सरकारकडे मागण्या करण्यात आल्या, सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. पण सरकार दाद द्यायलाच तयार नाही. बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहताना भाजपाने अनेक ठिकाणी बेसन-भाकर आंदोलन केले. pic.twitter.com/a7FPqjkneD
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 14, 2020
दीपोत्सवाचे पर्व साजरे होत असताना आपला बळीराजा मात्र मदतीविना संकटात आहे. त्याची दिवाळी या सरकारने अंधारातच ठेवली. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, संत्र्याचे प्रचंड नुकसान झाले. बोंडअळीने कपाशी संपविली. मराठवाडा, विदर्भ आणि इतरही सर्व भागात हीच अवस्था! पण मदत द्यायला सरकार तयार नाही, असे फडणवीस म्हणाले. बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहताना भाजपाने अनेक ठिकाणी बेसन-भाकर आंदोलन केले.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो, असे म्हणत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.