सांगली : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वातावरण पेटलं असून ठिकठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. दरम्यान आरक्षणाच्या मागणीवरुन धनगर समाजही आक्रमक झाला आहे. धनगर समाजाचे नेते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे.
येत्या २५ सेप्टेंबरला धनगर समाजाच्या वतीने विविध ठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. ‘ सरकारला सत्तेत येऊन दहा महिने झाले आहेत तरी देखील सरकारने आरक्षणाचा मुद्धा निकाली काढला नाही त्यामुळे हे सरकार झोपलंय कि झोपेचं सोंग घेतय अशी टीका पडळकर त्यांनी यावेळी केली. तसेच सरकारला जागे सरकारण्या साठी आम्ही ढोल ‘बजाओ सरकार जागाओ’ आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याधीही गोपीचंद पडळकर यांनीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं होतं . यामध्ये आरक्षण मिळालं नाही तर राज्य सरकार आणि धनगर समाजातील संघर्ष अटळ आहे असा इशाराच दिला होता. त्यापार्शवभूमीवर आता राज्यात मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर आरक्षणावरूनही वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Read Also :