मुंबई – राजधानी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून केंद्रीय कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरत आहे. शेतकरी आंदोलनाला जागतिक स्तरावरून पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.
यासंदर्भात, सर्वप्रथम अभिनेता अक्षय कुमारने ट्विट करुन मत मांडलं. त्यानंतर, मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपले मत मांडले. त्यानंतर, गाणगोकिळा लता मंगेशकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवरुन सरकारच्या बाजुने आपलं मत मांडायला सुरुवात केली आहे
भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या ट्विटमधील फोटो अक्षय कुमारने आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. तसेच, शेतकरी हा देशाचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत, ते दिसूनही येतंय. चला सौहार्दपूर्णपणे या समस्येचं समाधान काढूयात, ना की देशाला तोडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यायंचं. #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda…”, असे ट्विट अक्षय कुमारने केले आहे.
Farmers constitute an extremely important part of our country. And the efforts being undertaken to resolve their issues are evident. Let’s support an amicable resolution, rather than paying attention to anyone creating differences. 🙏🏻#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda https://t.co/LgAn6tIwWp
— Akshay Kumar (@akshaykumar) February 3, 2021
त्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकर केलेलं ट्विटवर समिंश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे ‘भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. भारतात जे काही घडत आहे, बाह्य शक्ती त्याचे प्रेक्षक होऊ शकतात परंतु सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि त्यांनीच निर्णय घ्यावा, चला एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया,” असं आवाहन महान फलंदाज सचिन तेंडुलकरने यानं ट्विट करून केलं. सचिननं बुधवारी केलेल्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सचिननं हे ट्विट करून केंद्र सरकारला समर्थन दिल्याच्या भावना उमटत आहेत.
India’s sovereignty cannot be compromised. External forces can be spectators but not participants.
Indians know India and should decide for India. Let's remain united as a nation.#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 3, 2021
विशेष म्हणजे भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने अक्षय कुमारचेच सेम ट्विट केलंय. अक्षयच्या ट्विटची कॉपीच भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवालने केल्याचे दिसून येते. कारण, सायनाने केलेले ट्विट व अक्षयच्या ट्विटमधील शब्द न शब्द सेमच आहेत. अक्षयने बुधवारी दुपारी 2.07 वाजता ट्विट केले असून सायनाने त्याच दिवशी रात्री 10.26 वाजता ट्विट केलंय. त्यामुळे, इंडिया टुगेदरच्या म्हणणाऱ्या सेलिब्रिटींचं ट्विट टुगेदर झाल्याचं दिसून येत आहे.
Farmers constitute an extremely important part of our country. And the efforts being undertaken to resolve their issues are evident. Let’s support an amicable resolution, rather than paying attention to anyone creating differences. 🙏🏻#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda pic.twitter.com/FhclAMLiik
— Saina Nehwal (@NSaina) February 3, 2021
राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींनी पाठींबा दिल्यानंतर आता वेगळेच वळण घेतले आहे. बाहेरच्या व्यक्तींनी भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खूपसू नये असा पलटवार देशातील अनेक सेलिब्रेटींनी केली.
मतभेदांच्या या घटनेत आपण सर्वजण एकजूट राहू या. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि मला खात्री आहे की शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि एकत्रितपणे पुढे जाण्यासाठी सर्व पक्षांमध्ये एक मैत्रीपूर्ण तोडगा निघेल. असे ट्विट विराट कोहली याने केले आहे.
Let us all stay united in this hour of disagreements. Farmers are an integral part of our country and I'm sure an amicable solution will be found between all parties to bring about peace and move forward together. #IndiaTogether
— Virat Kohli (@imVkohli) February 3, 2021
जेव्हा आपण सर्वजण एकत्र उभे राहतो आणि यावर तोडगा काढणे ही काळाची गरज असते तेव्हा भारत नेहमीच बलवान होता. आमचे शेतकरी आपल्या देशाच्या कल्याणात महत्वाची भूमिका बजावतात आणि मला खात्री आहे की सर्वांनी एकत्रितपणे तोडगा काढतील असे ट्विट रोहित शर्माने केले आहे
India has always been stronger when we all stand together and finding a solution is the need of the hour. Our farmers play an important role in our nation’s well being and I am sure everyone will play their roles to find a solution TOGETHER. #IndiaTogether 🇮🇳
— Rohit Sharma (@ImRo45) February 3, 2021
अर्ध्या सत्यापेक्षा धोकादायक असे काहीही नाही म्हणून आपण नेहमी गोष्टींकडे सर्वदृष्टिकोनातून पाहिले पाहिजे .
We must always take a comprehensive view of things, as there is nothing more dangerous than half truth. #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda @hiteshjain33 https://t.co/7rNZ683ZAU
— Suniel Shetty (@SunielVShetty) February 3, 2021
There’s no issue that cannot be resolved if we stand together as one. Let’s remain united and work towards resolving our internal issues #IndiaTogether
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) February 3, 2021