छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुण्यातील एक कंपनी बिडी उत्पादन करतेय. महापुरुषांच्या नावाचा असा गैरवापर करणं अक्षम्य चूक आहे. लोकभावनेचा विचार करुन संबंधित कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 4, 2020
यावर अनेकांनी रोहित पवारांच्या विचाराला सहमती दर्शवली आहे. मात्र, एका ट्विटर युजर्सने रोहित पवारांनाच सवाल केला आहे. संभाजी नावाने कंपनीची नोंदणी असेल तर, त्यास सरकारनेच परवानगी दिली आहे. त्यात गैरवापर काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, या कंपनीत कित्येक गरीब लोकं काम करतात. या गरिबांचं पोट शंभूराजेंच्या नावाने चालवणाऱ्या कंपनीमार्फत भरत असेल तर त्यात बिघडलं कुठं? असा सवाल @swapnilkharat या ट्विटर युजर्सने उपस्थित केला आहे.