मुंबई : राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून वाढीव वीज बिल माफ होणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. विरोधकांकडून वीज बिल माफ करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जोपर्यंत राज्य सरकार वीज बिल माफ करत नाही, तोपर्यंत वीज बिल कोणीही भरू नये, असे आवाहन केले आहे.
कोरोना च्या संकट काळात सामान्य जनतेला मागील 8 महिन्यापासून आर्थिक उत्पन्न नाही. वीज वापरल्याने बिल पूर्ण भरावे लागेल ही महाराष्ट्र राज्य सरकार ची भूमिका चुकीची आहे. वीजबिल 50 टक्के माफ करावे अशी मागणी असून 50 टक्के वीजबिल माफ होई पर्यंत वीजबिल कोणी भरू नये. @CMOMaharashtra
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) November 20, 2020
रामदास आठवलेंनी ट्विट केले की, कोरोनाच्या संकट काळात सामान्य जनतेला मागील 8 महिन्यापासून आर्थिक उत्पन्न नाही. वीज वापरल्याने बिल पूर्ण भरावे लागेल ही महाराष्ट्र राज्य सरकार ची भूमिका चुकीची आहे, असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. सोबतच त्यांनी वीज बिल 50 टक्के माफ करावे, अशी मागणी केली आहे.
50 टक्के वीजबिल माफ होईपर्यंत वीजबिल कोणीही भरू नये, असे आवाहन देखील त्यांनी केले.