नुकताच बिहार विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा जरी करण्यात आला अय जाहीरनाम्यात भाजपने मतदारांना कोरोनाची मोफत लस देण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनावरुन आता चांगलेच राजकारण तापल्याचे समोर आले आहे.
भाजपच्या जाहीरनाम्यात सत्ता आल्यास बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देणे, हे आमचे प्रमुख आश्वासन असल्याचे यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर भाजपच्या या आश्वासनावर विरोधकांनी तोफ डागली आहे. विरोधकांकडून भाजपवर टीकेबाजी करण्यास सुरुवात झाली आहे.
तर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही सवाल उपस्थित केला आहे. कोरोना लस भाजप लोकांचे जीव वाचवण्यासाठी देत आहे की निवडणुका जिंकण्यासाठी देत आहे, असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे. कोरोना लस भाजप लोकांचे जीव वाचवण्यासाठी देत आहे की निवडणुका जिंकण्यासाठी देत आहे, असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
भारतीय जनता पार्टी निवडणूक हरली तरी या देशातल्या लोकांना लस मोफतच मिळणार आहे आणि महाराष्ट्रातील जनतेला ही लस पूर्ण मोफत दिली जाईल, असं स्पष्टच नवाब मलिक यांनी सांगितलं.
तसेच बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता आल्यास मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देऊन भाजपाने कोरोना लसीचेही राजकारण केले.यावर प्रियांका चतुर्वेदी तसेच बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांनीही भाजपवर जोरदार टीका केली आहे.