मुंबई : नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यातच राज्यातून भाजपच्या नऊ जागा जिंकून आल्या आहेत. यातच काही खासदारांना केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे. त्यातच आता रक्षा खडसे यांची केंद्रात वर्णी लागलीय. त्यावर त्यांनी आता आपली प्रतिक्रिया दिलीय.
लोकसभा निवडणुकीतील विजयाचं आणि या यशाचं श्रेय जनतेला द्यावं लागेल. कारण जनतेमुळेच मी तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहे. यासह आमच्या सर्व नेत्यांचे मी आभार मानते, त्यांच्या योगदानामुळे मी निवडून आले आहे. असं रक्षा खडसे म्हणाल्या.
रक्षा खडसे यांची केंद्रात वर्णी लागल्यानंतर एकनाथ खडसे यांनी देखील मोठी प्रतिक्रिया दिलीय. रक्षा खडसे केंद्रीय मंत्री होत असल्याचा मनस्वी आनंद आमच्या कुटुंबाला आणि गावकऱ्यांना आहे. मला वाटतं की गेले. अनेक वर्षे भाजपात काम करत असताना त्या कामाचं श्रेय आणि रक्षा खडसेंनी भाजपावर ठेवलेली निष्ठा याचं फळ म्हणून तिला आज शपथविधीसाठी बोलावण्यात आलं आहे. साऱ्यांचेच आशीर्वाद आमच्या परिवाराच्या पाठीशी आहेत. खासकरून तिसऱ्यांदा तिला संधी दिली. याबद्दल मतदारांचे आभार. मतदारांमुळेच दिल्लीपर्यंत आणि मंत्रिपदापर्यंत जाण्याची संधी मिळाली.
READ ALSO :
हेही वाचा..“एक सामान्य कार्यकर्ता ते थेट कॅबिनेट मंत्रीपद”, कसा आहे मोहोळांचा राजकीय प्रवास ?
हेही वाचा…“मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात अजित पवार गटाला स्थान नाही”, दिल्लीत मोठी खलबतं
हेही वाचा…“शरद पवारांना मी सोडायला नव्हतं पाहिजे होतं”, कुणी केली खंत व्यक्त
हेही वाचा..ठरलं तर मग..! येत्या एक दोन आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार ?