पारनेर: सध्या अहमदनगर जिल्हातील पारनेर, श्रीगोंदा यांना जलसंजीवनी असणाऱ्या कुकडीच्या पाण्यावरून हे तालुके चांगलेच पेट घेत आहेत. पारनेर मधील महादेव मंदिर येथे कुकडीच्या हक्काच्या असणाऱ्या पाण्यासाठी न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी सर्वानी एकत्र येऊन एकजूट करत मशाल पेटवली आहे. कुकडी पाटबंधारे प्रकल्प पाणी वाटपाच्या बाबतीत डाव्या कालव्यावरील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर गेल्या २५ वर्षांपासून सतत अन्याय होत आलेला आहे. या प्रकल्पातील धरणग्रस्तांचे पुनर्वसन पारनेर आणि श्रीगोंदा या तालुक्यांतच झाले आहे. Rehabilitation of dam victims of Kukdi Dam project has been done in Parner and Shrigonda talukas.
डावा कालवा चे क्षेत्र पावणे दोनशे किलोमीटर लांब आहे. प्रकल्पाचे लाभक्षेत्र जवळपास सत्तर टक्के आहे. दरवर्षी या सत्तर टक्क्यातील फक्त तीसच टक्के पाणी मिळते. त्यामुळे नेहमीच या भागात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. दरवर्षी पिकेचे पिके जळत आहेत.पुणे जिल्हयाला अत्यंत कमी लाभक्षेत्र आहे. कमी लाभक्षेत्र असून देखील या प्रकल्पातून पुणे जिल्हयाला बेकायदेशीर आणि बेसुमार पाणी वापर होतो. डाव्या कालव्यातील शेतकरी पाण्या अभावी आपली पिके सोडून देतात. Establishment of Kudadi Sangharsh Samiti for court battle over water allocation of Kukdi Dam
मुळातच या पाण्याचे शाश्व्त वाटप निश्चित नसल्यामुळे पिकांचे नियोजन करणे अवघड झाले आहे. त्यामुळेच जलसंपत्ती प्राधिकरण आणि न्यायालय यांच्याकडून लाभक्षेत्रानुसार सामान पाणीवाटप करून घेण्याचे ठरले आहे. यासाठी जवळा येते कुकडी पाणी संघर्ष समिती Kudadi Sangharsh Samiti स्थापित करण्यात आली आहे. न्यायालयीन लढा उभारूनच न्याय मिळणार आहे यावर सर्वांचे एकमत आहे. यावेळी बैठकीला पारनेर तालुक्यातील नेते मंडळी उपस्थिती होती. यावेळी गणेश शेळके, ठकाराम लंके, सुभाष आढाव, राहुल शिंदे, संदिप सालके, गोरख पठारे, पंकज कारखिले, साहेबराव पानगे, कारभारी कोठावळे, पंढारीनाथ कवाष्ठे, सालके, सतिष रासकर, अरूण सालके, पुंडलिक शेवकर, संतोष सालके, श्रीधर पठारे, विशाल गायकवाड, मंगेश कार्ले आदी शेतकरी उपस्थित होते.