मुंबई : राष्ट्रवादी आणि भाजपमधील सध्याचे नाते हे संपूर्ण महाराष्ट्राला दुविधा परिस्थितीत टाकणारे आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपशी हात मिळवणी केल्यानंतर शरद पवारांनी स्वतः पुढाकार घेऊन अजित पवारांना शह दिल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. अनेकदा तर स्वतः शरद पवारांनी देखील मोदी सरकारला काही महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन केल्याचे दिसून आले आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी एका मुद्द्यावरून आम्ही केंद्रातील मोदी सरकारच्या पाठीशी आहोत असे म्हणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
जम्मू आणि काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते फारूख अब्दुल्ला यांनी भारत सोडण्याबाबत घेतलेली भूमिका आणि 370 कलम व चीनबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाने संपूर्ण देशभर नाराजी आहे.सोशल मीडियावर तर या मुद्यावरून अब्दुल्ला यांना टीकेचे धनी व्हावे लागत आहे. स्वतंत्र भारतातील अब्दुल्ला यांच्या सारख्या नेत्याला देशाने आणखी काय द्यायला हवे असा सवालही केला जात आहे.
या मुद्याकडे लक्ष वेधत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनीही अब्दुल्ला यांच्यावर टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट करीत अब्दुल्ला यांनी चीनबाबत केलेले विधान समर्थनीय नसल्याचे म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारने चीनसारख्या देशाला खंबीरपणाने उत्तर द्यावं, जनता आणि सर्वजन त्यांच्या पाठिशी उभे आहोत अशा प्रकारे तटकरे यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली.
नेमकं काय म्हणालेत तटकरे यावेळी
तटकरे म्हणाले, की जम्मू-काश्मिरातील ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय झाला तेव्हा फारूख अब्दुल्ला हे सभागृहात नव्हते. हे कलम रद्द झाले आहे. मात्र चीनला पाठिंबा देणे ही त्यांची भूमिका योग्य वाटत नाही. चीनने 1962 मध्ये भारताशी युद्ध केले आहे. चीन आणि भारत यांच्यामध्ये वेळोवेळी करारही झाले आहेत. त्या त्या वेळच्या पंतप्रधानांनी तसे करार केले आहेत. त्यामुळे भारताने चीनबाबत घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देणे योग्य ठरेल असे मला वाटते.
Read Also
किसने बनाया बा ये ? माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा CM ठाकरेंवर निशाणाhttps://t.co/dkXG8eZCNk#PowerCut #Balabhegade #CMThackarey #MahavikasAaghadi @BalaBhegade
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 13, 2020