मुंबई : महाराष्ट्रात सध्या जागतिक महामारीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. त्यातच अपुरा ऑक्सिजनचा साठा , रेमेडीसीवरचा तुटवडा आणि बेड्सची कमी संख्या यामुळे अडचणींमध्ये भर पडत आहे. दरम्यान या काळात रेमेडीसीवरच्या पुरवठ्यावरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकारण सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक, मग ते केंद्रातले असो की राज्यातले एकमेकांवर सडकून टीका, आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
यातच आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना, केंद्र सरकारवर आणि राज्यातल्या विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारला करोना लस १५० रुपयांना मिळते, मग राज्य सरकारला तीच लस ४०० रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये प्रति डोस दराने का दिली जाते?, दुश्मन राष्ट्र असलेल्या पाकिस्तानला करोनाची लस फुकट दिली जाते, मग राज्याला ४०० रुपयेने का? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
तसेच, सिरम कंपनी लसीच्या किंमतीत जो भेद करत आहे. त्याचा यावेळी काँग्रेसकडून त्यांनी निषेध केला आहे. जर लॉकडाऊन नसतं, तर आम्ही आंदोलन केलं असतं. देशाच्या पंतप्रधानांनी कोविडबाबतचे व्यवस्थित नियोजन केले असते, तर आज ही परिस्थिती आली नसती. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आपला देश अधोगतीला लागला आहे, अशी टीका करत त्यांनी केंद्राने ही लस जगातल्या इतर काही देशांसारखी मोफत द्यावी, अशी मागणी केली आहे.
पाकिस्तानला फुकट लस देता, मग राज्याला 400 रुपये दराने का?, काँग्रेसचा सवालhttps://t.co/hyThvKvEvT #Nanapatole #Congress #Corona #CoronaVaccine
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 24, 2021