सांगली : राज्यात सर्वाधिक कोरोना मृत्यूदर सांगली जिल्ह्यात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला अपयश आल्याने पालकमंत्री जयंत पाटील यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी अशी मागणी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
दोन्ही आमदारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करून चटणी-भाकरी खात पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध केला. जोपर्यंत परिस्थिती सुधारणा होण्यासाठी हालचाली करत नाही, तोपर्यंत येथून उठणार नसल्याची देखील भूमिका त्यांनी घेतली.
या दोन्ही आमदारांशी चर्चा करण्यासाठी जंयत पाटील यांच्या दौऱ्यावर असलेले जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी देखील दौरा सोडून आले.
जिल्ह्यात ऑक्सिजन खाटांची कमतरता आहे. पुरेसे व्हेंटिलेटर नाहीत. व्हेंटिलेटरअभावी रुग्णांचे जीव जात आहेत. या स्थितीत सांगतील ऑक्सिजन प्लान्ट तयार करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची होती. त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. कोरोना संसर्गानंतर ते जिल्ह्यातील परिस्थिती हाताळू शकले नाहीत. या अपयशाची जबाबदारी घेऊन त्यांनी तातडीने पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा,’ अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली.