मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसोंदिवस वाढत आहे. या पार्शवभूमीवर सांगली जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू दर असल्याचे आढळळून आले आहे, त्यामुळे भाजप आमदार गोपीचं पडळकर यांनी सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
‘सांगली जिल्हा हा जयंत पाटलांची जहागिरी आहे काय ? लोकप्रतिनिधींना आढावा बैठकीसाठी बोलवण्याचे त्यांच्यात धाडस नाही. असे जिल्ह्यात फिरणे मुश्किल होऊन जाईल. दुसरीकडे जिल्ह्यात ऑक्सिजन बेड्सची कमतरता आहे. आवश्यक तेवढे व्हेंटिलेटर नाहीत. पालकमंत्र्यांनी मात्र जिल्ह्यातील या स्थितीकडे दुर्लक्ष केले. जिल्ह्यातील रुग्णालयांना आवश्यक सुविधा पुरवण्यातही ते अपयशी ठरले. ” असे पडळकर म्हणले आहेत
तसेच “पालकमंत्री जिल्ह्याला निधी मिळवून देऊ शकले नाहीत हा त्यांचा नाकर्तेपणा आहे. या अपयशाची जबाबदारी घेऊन सांगलीच्या पालकमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा’, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. यामुळे, सांगलीच्या पालकमंत्र्यानी तातडीने राजीनामा द्यावा”, असे आक्रमक मागणी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सदाभाऊ खोत यांनी केली आहे