मुंबई : बांधकाम क्षेत्रात मागणी वाढवण्याच्या नावाखाली मूठभर खासगी लोकांचे भले करणारा निर्णय तात्काळ रद्द करा, अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले आहे.
बांधकाम क्षेत्रात मागणी वाढविण्याच्या नावाखाली मूठभर खाजगी लोकांचे चांगभले आणि राज्याचे हजारो कोटींचे नुकसान करणारा निर्णय तत्काळ स्थगित करा करावी, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे. बांधकाम जगताला उभारी देण्यासाठी काय उपाय करता येतील, यासाठी दीपक पारेख यांच्या अध्यक्षतेत एका समितीने काही शिफारसी राज्य सरकारला केल्या होत्या. पण, त्यातील काही निवडक आणि सोयीच्या शिफारसींची अंमलबजावणी केली जात असल्याचे फडणवीसांनी पत्रात म्हटले आहे.
बांधकाम क्षेत्रात मागणी वाढविण्याच्या नावाखाली मूठभर खाजगी लोकांचे चांगभले आणि राज्याचे हजारो कोटींचे नुकसान करणारा निर्णय तत्काळ स्थगित करा.
मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरेजी यांना पत्र…@OfficeofUT pic.twitter.com/jlW03MpKHu— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 27, 2020
मुद्रांक शुल्कातील सवलत, रेडीरेकनर दर आणि प्रिमीयम या काही आवश्यक बाबी आहेत, पण, त्याचा केवळ मुठभर लोकांनाच लाभ होणार नाही, हेही बघणे आवश्यक आहे. हा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणण्यात आला होता. पण, तो पुढच्या बैठकीपर्यंत थांबविण्यात आला. केवळ पाच विकासकांच्या प्रस्तावांचा विचार केला, तरी त्यांना 2000 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.
यावर कुठलीही सुधारात्मक कार्यवाही झाली नाही तर मी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करेल, असा इशारा देखील त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.