मुंबई : राज्यात मंदिरं उघडण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या पत्रावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चांगलाच वाद पेटला होता. यानंतर हे दोन्ही राजकीय नेते पोलीस स्मृती दिन 2020 च्या कार्यक्रमाला एकाच व्यासपीठावर आमनेसामने येण्याची शक्यता होती. मात्र राज्यपालांनी या कार्यक्रमाला येणे टाळले.
आज सकाळी हुतात्मा मैदान, नायगाव पोलीस मुख्यालय इथं ‘पोलीस स्मृती दिन’ मानवंदना कवायतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक हजर होते. मात्र राज्यपाल कोश्यारी गैरहजर राहिल्याने आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला हजर असल्यामुळे राज्यपालांनी त्यांच्यापासून दूर राहण्याचा पवित्रा घेतल्याचं दिसून आले आहे.