मुंबई : उदय सामंत यांना धमक्यांचे फोन येत असल्यामुळे त्याची सुरक्षा व्यवस्था आता वाय प्लस एस्कॉर्टसह (Y with Escort) दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबत गृहमंत्रालयानं राज्य गुप्तवार्ता विभाग तसेच पोलीस महासंचालकांना पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे.
उदय सामंत हे अमरावती विद्यापीठात परीक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी गेले होते. या दरम्यान काही विद्यार्थी संघटनांनी उदय सामंत यांना फोनवरून धमकी दिली होती. ‘आम्ही उदय सामंत यांना नागपूरला पोहोचू देणार नाही’, अशी फोन वरून धमकी दिल्याची माहिती खुद्द उदय सामंत यांनी दिली होती. मात्र, आपण अशा पोकळ धमक्यांना घाबरत नसून ज्या विद्यार्थी संघटनांना चर्चा करायचे असेल त्यांनी आपल्याशी चर्चा करावी, असं आवाहन उदय सामंत सावंत यांनी केलं होतं. आपण अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही. आपण विद्यार्थ्यांच्या हिताचं काम करणार आहे, असं उदय सामंत यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, शिक्षण मंत्री उदय सामंत यांना गेल्या काही दिवसांपूर्वी विद्यार्थी संघटनेकडून धमकीचा फोन आला होता. उदय सामंत हे गेल्या आठवड्यात अमरावती विद्यापीठ दौऱ्यावर होते. दौरा आटोपून ते नागपूर विद्यापीठाकडे निघणार होते. त्याचवेळी उदय सामंत यांना फोनवरून धमकी देण्यात आली होती. यापार्शवभूमीवर राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.
Read Also
माझी दोन नंबरची कामं नाहीत, त्यामुळे तुकाराम मुंढे काय किंवा…https://t.co/x1aapTyjUu#DevendraFadanvis #Tukarammundhe #NagpurBJP @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @bjp4mumbai @BJP4PuneCity
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 25, 2020