मुंबई : राज्यातल्या 34 जिल्ह्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान तर 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. यासाठी आठ जिल्ह्यात सरपंचपदाचे आरक्षण देखील जाहीर करण्यात आले होते. मात्र आता ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत पूर्ण होणार असल्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.
राज्यातल्या 14 हजार ग्रामपंचायतीच्या राजकारणाचा उलटफेर करणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता निवडणुकीनंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत पूर्ण होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्रालयाने दिली आहे.
आधीच आरक्षण सोडत काढल्याने सरपंच होण्यासाठी किं वा त्या पदावर आपल्या मर्जीतील व्यक्तीची वर्णी लावण्यासाठी मोठय़ा प्रमाणात घोडेबाजार होतो. तसेच बनावट जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणूक लढवून सरपंच होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. या प्रकारांना लगाम घालण्यासाठी आरक्षण सोडत पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता 14 हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचांची आरक्षण सोडत जानेवारीमध्ये काढण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.