मुंबई : राष्ट्रीय कार्यकारिणी हा भाजपचा विषय आहे, त्यावर बोलणे संयुक्तिक नाही. मात्र, एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर निश्चितच भाजपने अन्याय केला आहे, असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी शनिवारी जाहीर झाली. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नव्या टीमची घोषणा केली. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील नाराज नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचवेळी एकनाथ खडसे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीवर देखील संधी देण्यात आलेली नाही.
जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अगोदर झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत देखील मूग, उडीद पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली होती. आता कापसाचे नुकसान झाल्याने शनिवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
Read Also :