आम्ही सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात काहीही तथ्य नसल्याचे सुरुवातीपासूनच सांगत होतो. भाजपने या प्रकरणाचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी वापर केला. आता या प्रकरणाचे ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ झाले आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगतिले. भाजपकडून सुंशांतसिह आत्महत्या प्रकरणाचा वापर बिहारच्या राजकारणासाठी करण्यात आला.
मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला राज्यपालांनी भेट दिली का? राज्यपालांनी कंगना रणौतला भेट दिली, हे राजकारण होते. महाराष्ट्राच्या पोलिसांना सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बदनाम केले गेले. पोलिसांनी काहीच केले नसल्याच्या आरोप केला गेला. मात्र, सीबीआय चौकशीत गेल्या दीड महिन्यात काय झाले, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला.
Read Also :
शेतकऱ्यांच्यासह कामगार देशोधडीला लागतील; राहुल गांधींचा आरोप https://t.co/xdvX5w3cpf #Congress
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 5, 2020