मुंबई : हरियाणातील यू-ट्यूबर साहित चौधरी यानं महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. या प्रकरणात साहिल चौधरीला अटक करण्यात आल्यानंतर कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. यावेळी कंगनाने मुख्यमंत्री ठाकरेंचा उल्लेख अकार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून केला आहे.
मुंबईत गुंडाराज चालू असल्याचा आरोप करत कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री असा उल्लेख करत टीका केली आहे. साहिल चौधरीला अटक केल्यानंतर कंगनानं ट्विट केलं असून, काँग्रेसला सवाल केला आहे.
साहिलनं महाराष्ट्र सरकारला त्यांच्या कामावरून प्रश्न विचारले म्हणून कुणीतरी त्यांच्याविरोधात अचानक गुन्हा दाखल केला, जो की त्याचा लोकशाही अधिकार आहे. त्यानंतर साहिलला तात्काळ तुरूंगात टाकण्यात आलं. पण, पायल घोषनं अनुराग कश्यपविरोधात अनेक दिवसांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पण, तो मुक्तपणे फिरतोय. हे सगळं काय आहे, असा सवाल कंगनानं काँग्रेसला केला आहे.
Somebody random files a FIR against Saahil for questioning Maha Government’s work which is his democratic right and Shaahil is jailed immediately but #PayalGhosh has filed a FIR against #AnuragKashyap many days ago for rape but he is roaming free. Kya hai yeh sab @INCIndia ? https://t.co/B2S7VhlQDB
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 29, 2020