देशात पुन्हा राजेशाही आणणारं आहे, अशी टीका राठोड यांनी केली. ‘आम्ही बहुजन समाजाची लोकं नेहमीच छत्रपतींच्या आदर करतो मात्र खासदार महोदयच असं जर बोलायला लागले तर असं वाटतं की त्यांना परत राजेशाही आणायची आहे. ते यापूर्वीही अनेकदा बोलले आहेत की लोकशाही नको राजेशाही आणा. मग राजेशाहीच आणायची असेल तर आम्हाला देखील विचार करावा लागेल की संविधानाला मानणारे कोण आणि संविधानविरोधी कोण?’, असं राठोड म्हणाले.
‘मराठा समाजातील मुलांना चांगले गुण मिळूनही अॅडमिशन मिळत नाही, मात्र इतर समाजात कमी गुण असतानाही प्रवेश मिळतो. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली, आहे त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करुन, मार्क असूनही अॅडमिशन न मिळाल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत आहे’, अशी खंत उदयनराजेंनी साताऱ्यात बोलताना व्यक्त केली.
Read Also :
…तर देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागेलhttps://t.co/ZmtVUKktIt#DevendraFadanvis #BJP #Congress
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 28, 2020