पुणे : महाराष्ट्रात ढगफुटीने शेतीचे संपूर्ण नुकसान झाले आहे. शेतकरी वर्गाने जगायचे कसे हे कळत नाहीये. तरी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यानी शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी एक मोठे पॅकेज जाहीर करावे व शेतकरीवर्गाचा खात्यावर थेट रक्कम जमा करावी. नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी येणार्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला आपली जागा दाखवतील. असा इशारा राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड .श्रीहरी बागल यांनी दिला आहे.
कोणतेही कायदेशीर सोपसकर नकरता तत्काळ ठोस अशी मदत करावी.अन्यथा येणार्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टी ला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. यासाठी राष्ट्रीय स्वराजसेने कडून आज सकाळी दहा वाजता वाघोली, पुणे येथे एक मोठे आंदोलन करण्यात आले होते.
रास्ता रोको करण्यात आला होता. पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप केल्यामुळे व मोठी वाहतुक कोढी झाल्यामुळे पोलिसांना सहकार्य करून आदोलन आटोपले व घटना स्थळी आलेले लोणीकद पोलिस स्टेशन, पुणे याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मानकर यांना मागणीचे लेखी स्वरुपात निवेदन ही देण्यात आले आहे.
दरम्यान आज शेतकऱ्यांना मारण्याचं धोरण केंद्र सरकारचं आहे. एका बाजूला कांद्याची निर्यातबंदी केली. शेतकऱ्यांसाठी हा दुर्दैवी निर्णय आहे. महाराष्ट्राच्या द्वेषाने केंद्राला पछाडलं आहे. कांदा म्हणजे महाराष्ट्र हे सूत्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडून आलेले पंतप्रधान आहेत का दलाल आहेत, हेच कळत नाहीये, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.
Read Also ;
सीबीआयचा वापर राजकीय स्वार्थासाठी, म्हणून हा निर्णय घ्यावा लागला: अनिल देशमुखhttps://t.co/YCiHloBgy6 @AnilDeshmukhNCP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 22, 2020