परभणी : राज्यातील शेतकऱ्यांचं परतीच्या पावसाने मोठं नुकसान झालं असून, शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्याच्या सोबत आहे. या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकार का दुर्लक्ष करते?, असा सवाल कृषी आणि न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. परभणी जिल्हा दौऱ्यावर असताना ते बोलत होते.
बिहारमध्ये निवडणुका असल्याने केंद्र तेथील शेतकऱ्यांना तातडीने मदत करत आहे, मात्र महाराष्ट्रातील शेतकरी केंद्र सरकारला महत्त्वाचा वाटत नाही का ? असा सवाल विश्वजित कदम यांनी विचारला आहे. राज्यातील भाजपच्या नेत्यांनी केंद्राकडून मदतीसाठी पाठपुरावा करावा, असेही ते म्हणाले.
केंद्र सरकार जीएसटीचे पैसे देत नसताना राज्य सरकार 10 हजार कोटी रुपयांची मदत देत आहे. ही मदत महिन्याभरात शेतकऱ्यांना मिळेल, अशी माहिती देखील त्यांनी दिली.