पिंपरी-चिंचवड : होळकरांचा वाडा इतके दिवस फुकट वापरला, आता किल्ल्याच्या संवर्धनासाठी 50 कोटी द्या, असं म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर हल्लाबोल केलाय. वाफगाव किल्ल्याची आज गोपीचंद पडळकरांनी पाहणी केली, त्यावेळी ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
वाफगाव किल्ल्याची ती वास्तू जतन झाली पाहिजे, संवर्धित झाली पाहिजे. त्यामुळेच या किल्ल्यासंदर्भात रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांनी त्वरित निर्णय करावा. ही वास्तू सरकारकडे घ्यावी आणि या वास्तूला संवर्धित स्मारकाचा दर्जा द्यावा, अशी मागणीही गोपीचंद पडळकरांनी केलीय.
या किल्ल्याच्या संवर्धनासाठी 50 कोटी रुपयांचा निधी द्यावा. ते आता सरकारमध्ये आहेत, सरकार त्यांचं आहे. त्यामुळे आमची मागणी ही कुठल्याही राजकीय हेतूनं प्रेरित नाही, असंही गोपीचंद पडळकरांनी स्पष्ट केलंय.
वाफगाव किल्ला संवर्धनासाठी 50 कोटी द्या : गोपीचंद पडळकर
बहुजन समाजाची आस्था या किल्ल्यावर आहे. किल्ल्यातील शाळा दुसरीकडे हलवा. वाफगाव किल्ला संवर्धनासाठी 50 कोटी द्या, याचा पुनरुच्चारही गोपीचंद पडळकरांनी केली. रयत शिक्षण संस्थेला 1955 साली ही वास्तू शैक्षणिक कार्यासाठी देण्यात आलेली आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षणाबाबतची दूरदृष्टी पाहून हा निर्णय घेण्यात आला. आज ही संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था झालीये. पण आज ही संस्था कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या हेतूपासून बाजूला गेल्याच चित्र आहे. नुकतंच या संस्थेचा मोठा भ्रष्टाचार ही समोर आलाय.
होळकरांनी वाफगावसारखे सहा भुईकोट किल्ले उभारले, त्यापैकी एकच किल्ला शिल्लक
या संस्थेची त्या काळात जागा घेणं, इमारत बांधण्याची क्षमता नव्हती. पण आज इथं पडझडीचं चित्र आहे. त्यामुळं शाळेत येणाऱ्या विध्यार्थी आणि शिक्षकांच्या जीवितास धोका होऊ शकतो. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष शरद पवारांनी तात्काळ निर्णय घेऊन ही वास्तू सरकार अथवा होळकर कुटुंबियांच्या ताब्यात द्यावी.
शिवाय 50 कोटींचा निधी सरकारने द्यावे. कारण ज्या मल्हारराव होळकरांनी वाफगाव सारखे सहा भुईकोट किल्ले उभारले, त्यापैकी हा एकच किल्ला आता उरलेला आहे आणि त्याची ही पडझड झालीये. याची डागडुजी केली तरच हा इतिहास जपला जाईल. तेंव्हा शरद पवारांना एकच सांगणं आहे, तुम्ही बरेच दिवस इथं फुकटात संस्था चालवली. आता याचं त्यांनी स्मारकात रूपांतर कराव, अशी मागणी मी विधान परिषदेत ही केलेली आहे, असा पुनरुच्चारही गोपीचंद पडळकरांनी केलाय.
Read Also :
‘नामांतर करायचंच असेल, तर आधी महाराष्ट्राचं करा’, उद्धव ठाकरेंना ‘या’ आमदाराने सूचवलं नाव
प्रस्ताव ‘मंत्रालया’तून आला की ‘वर्षा’वरून? मुंबई महापालिकेत शिवसेना-काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी
औरंगाबाद नामांतरण : शिवसेना बाजूने, काँग्रेस विरोधात, आता राष्ट्रवादीची भूमिका जाहीर
‘भाजपाने नाक घासून महाराष्ट्राची माफी मागितली, तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही’
‘औरंगाबादचं नाही तर पुण्याचं नामकरण संभाजीनगर करावं’, प्रकाश आंबेडकरांची मागणी