दिल्ली : पश्चिम बंगालमधील राजकारणाला गुरूवारी हिंसक वळण मिळालं. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये दोन्ही नेते कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी चालले असता ताफ्यातील त्यांच्या गाड्यांवर हल्ला करण्यात आला.
जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर आणि कारवर विटा आणि दगडांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात भाजपाचे काही नेते जखमी झाल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासंबंधी अहवाल मागवला आहे. तसेच, अमित शाह यांनी ममता बॅनर्जी सरकारला इशाराही दिला आहे.
आज बंगाल में भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda जी के ऊपर हुआ हमला बहुत ही निंदनीय है, उसकी जितनी भी निंदा की जाये वो कम है।
केंद्र सरकार इस हमले को पूरी गंभीरता से ले रही है। बंगाल सरकार को इस प्रायोजित हिंसा के लिए प्रदेश की शांतिप्रिय जनता को जवाब देना होगा।
— Amit Shah (@AmitShah) December 10, 2020
दरम्यान, जे पी नड्डा यांच्या ताफ्यातील कारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला असून यामध्ये कारवर विटा आणि दगडांनी हल्ला करत काचा फोडल्याचं दिसत आहे. हल्ल्यात पक्षाचे नेते मुकूल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय जखमी झाल्याचं जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे. भाजपा नेते कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
आज झालेल्या हल्ल्यात मुकूल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय जखमी झाले आहेत. लोकशाहीसाठी ही लज्जास्पद घटना आहे. ताफ्यात हल्ला झाला नाही अशी कोणतीही कार नाही. मी बुलेटप्रूफ कारमध्ये होतो म्हणून सुरक्षित आहेत. पश्चिम बंगालमधील अराजकता आणि असहिष्णुता संपवावी लागेल. मी आज केवळ दुर्गादेवीच्या आशीर्वादानेमुळेच बैठकीत पोहोचू शकलो, असं हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना नड्डा म्हणाले.
आज बंगालमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर हल्ला झाला ही खूपच निंदनीय घटना आहे. या घटनेचा कितीही निषेध करावा तरी कमीच आहे. केंद्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या राजकीय पुरस्कृत हिंसेच्या घटनेबाबत बंगालच्या सरकारला आता शांतताप्रिय जनतेला उत्तर द्यावंच लागेल”, असं ट्विट अमित शाह यांनी केलं.
Read Also :
यूपीएची ‘पॉवर’फूल खेळी… सोनिया गांधींच्या जागी शरद पवारांना मिळणार अध्यक्षपद?
भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर जोरदार हल्ला, कारवर तुफान दगडफेक
‘मोठ्या संख्येने आंदोलन करणारे शेतकरी वेडे आहेत का?’, काँग्रेस नेत्याचं संतापजनक विधान
…तर फडणवीस शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतील, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास