कोरोना व्हायरस महामारीमुळे सरकारने देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रिया राबवली. दैनंदिन जीवन सुरळीत करण्यासाठी काही नियम शिथिल करण्यात आले. केंद्र सरकारने देशभरात कुठेही सामान आणि प्रवाशी वाहतुकीसाठी ई पासची गरज लागणार नाही, असे स्पष्ट करत राज्यांना प्रवासी, मालाच्या वाहतुकीवर बंदी घालू नका असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे.
We have taken note of the recent guidelines announced by the centre removing all restrictions on inter-state & intra-state movement of goods & people. Appropriate decision will be taken regarding the same after discussion with Hon'ble CM & DCM.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) August 22, 2020
अनिल देशमुख यांनी ट्विट केले की, केंद्राने जाहीर केलेल्या अलीकडील मार्गदर्शक सूचनांची आम्ही दखल घेतली आहे. वस्तू आणि लोकांच्या आंतरराज्यीय आणि राज्यातंर्गत हालचालींवरील सर्व निर्बंध काढून टाकले आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, राज्य सरकार निर्णय घेईपर्यंत महाराष्ट्रात खाजगी वाहनांसाठी ई-पास आवश्यक आहे.