पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी आज शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पाडत आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर होणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला किती जागा मिळणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. त्यातच आता प्रसिद्ध राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी भाजपला किती जागा मिळणार ? त्यावर मोठा दावा केलाय.
हेही वाचा…“रक्ताचा नमुना घेण्यासाठी ६ तास, नंतर पिझ्झा खाऊ घातला, अमितेश कुमार यांची बदली करा”
प्रशांत किशोर म्हणाले की, माझ्या मते भाजप पुन्हा सत्तेवर येईल. उत्तर आणि पश्चिम भारतात त्यांना फार नुकसान होणार नाही. २०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपने ३०३० जागा जिंकल्या होत्या. उत्तर आणि पश्चिम भारतात भाजपाला फार मोठा फटका बसणार नाही. ते दक्षिण आणि पुर्वेतून ते नुकसान भरून काढतील. त्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशात भाजपची कामगिरी संतुलित असेल असेही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा..“तुम्ही नेमकं देसाई आहात की कसाई”? रवींद्र धंगेकरांचा शंभुराजेंना सवाल
दरम्यान, पुर्व आणि दक्षिण भारतातून भाजपच्या जागा आणि मतांची टक्केवारी वाढणार आहे. म्हणून मी म्हणतोय की, २०१९ इतक्या भाजपच्या जागा येतील. आडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रस्थापित सरकारविरोधात लाट आहे. त्यामुळे पुर्व भारतातून भाजपच्या जागा वाढू शकतात. पुर्व आणि दक्षिणमध्ये लोकांना भाजपचा अजून अनुभव नाहीय. त्यामुळे ते त्यांना संधी देतील. तेलंगणामध्ये भाजपचा विस्तार होईल. आंध्रप्रदेशमध्ये त्यांची आघाडी आहे. तामिळनाडू, केरल या भागातही भाजपची मतांची टक्केवारी वाढू शकते. असेही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा..जयंत पाटलांना तुम्ही कॉंग्रेसमध्ये प्रवेश द्याल का ? नाना पटोलेंनी दिलं हे उत्तर
हेही वाचा..“मुख्यमंत्र्यांच्या गुरांना हिरवागार चारा, तर मराठवाड्यात गुरांना कोरडा चारही नाही”
हेही वाचा…जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार, अर्धा शरद पवार गट रिकामा होणार ?
हेही वाचा…जुनपासून सुरू होणार पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं, मोठं कारण आलं समोर