सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टीका करणारे एक नाव म्हणजे अभिनेत्री कंगणा राणावत. मागील अनेक दिवसांपासून कंगणा सातत्याने बॉलिवूडमधील काही ठराविक व्यक्तींना लक्ष्य करत आहे. आपण बॉलिवूड-ड्रग्स माफियामधील संबंधांबाबत देखील खुलासे करणार असल्याचे तिने म्हटले होते
Thank you for your concern sir, I am actually more scared of Mumbai police now than movie mafia goons, in Mumbai I would need security either from HP government or directly from the Centre, No Mumbai police please 🙏 https://t.co/cXEcn8RrdV
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 30, 2020
याबाबत भाजप नेते राम कदम यांनी कंगणाला सुरक्षा देण्याची देखील मागणी केली. त्यांनी ट्विट केले होते की, अभिनेत्री कंगना रनौत बॉलिवूड आणि ड्रग्ज माफियांविषयी माहिती देण्यास तयार आहे. मात्र, यासाठी तिला सुरक्षा देणं गरजेचे आहे. दुर्देवं म्हणजे महाराष्ट्र सरकारने अजूनही तिला सुरक्षा दिलेली नाही. त्यांच्या या ट्विटला उत्तर देताना कंगणाने आपल्याला मुंबई पोलिसांची भिती वाटत असल्याचे म्हटले आहे.
कंगणाने ट्विट केले की, माझ्या काळजीसाठी धन्यवाद, बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी. मुंबई पोलीस नको, असे तिने म्हटले आहे.