मुंबई : हल्ली लोकांना राजकारणी काय बोलत आहेत किंवा काय टिका करत आहेत. त्याच्याशी काहीही देणंघेणं नाही. परंतु २०१४ साली देवेंद्र फडणवीस महागाईवर बोलत होते. काश्मिरी पंडितांबाबत बोलत होते. त्या वचनांचं आज दोन अडीच वर्षात काय झालं ? ज्यादिवशी महाराष्ट्रातून वेदांत गेला, फॉक्सकॉन केला. त्यावेळी हे काय करत होते. ? मी शेतकरी नाही. परंतु शेती कशी करायची? महाराष्ट्रातून जे उद्योग पळवले गेले आहे. त्यावर चर्चा करा. मी बिना कागद घेऊन बसतोय. त्या तिघांना बोलवा. मी एकटा इथं बसतोय. असं म्हणत ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांना थेट चॅलेंज दिले.
हेही वाचा….भाजपच्या आमदारांनी ठाकरेंना घेरलं, भुजबळांनी ठाकरेंची बाजू घेत चांगलचं सुनावलं
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जहरी टिका केली. ठाकरे म्हणाले की, या राज्यात फक्त एकच शेतकरी हेलिकॉप्टरने उतरून शेती करतात. ते दोनच वेळा शेतात जाऊन शेती करतात. एक म्हणजे अमावस्येला आणि दुसरा म्हणजे पौर्मिणेला शेतात जातात. असं म्हणत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांवर लाठीचार्ज करण्याचा आदेश या तिघांपैकी कुणी दिला ? असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी केला.
हेही वाचा..निवडणुकीनंतरही युगेंद्र पवार राजकारणात सक्रीय,अजितदादांच्या विरोधात विधानसभेची तयारी ?
दरम्यान, आज सध्या राजकीय नेते अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका करीत आहेत. असं महाराष्ट्रात कधी झालं नव्हतं. ज्यांच्या गळ्यात गळा आम्ही घालत होतो. तेच आता आमचे गळे कापायला निघाले होते. 2014 साली राज्यात बहुतमाचं सरकार आलं असतांना भाजपने आमच्यासोबतची युती तोडली. तर 2019 साली ज्या दिवशी पुलवामाची घटना घडली होती. त्याच दिवशी भाजपने युतीची घोषणा करण्यास सांगितलं होतं. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…पुण्यात कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल, प्रकरण काय ?
हेही वाचा…“अरविंद सावंताचा मोठा करिश्मा, विरोधात उमेदवार हुडकायला ..,” जयंत पाटलांची जोरदार टोलेबाजी