मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यानं मुंडे समर्थकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. त्यामुळे राजीनामा सत्रही सुरू झालंय. त्यातच पंकजा मुंडे दिल्लीत गेल्यानं चर्चांना उधाण आलंय. आता केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दिल्लीत पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याचं ट्विट केलंय. पंकजा मुंडे यांची भेट घेतली, मन मोकळं केलं, असं म्हणत त्यांनी या दिल्लीतील भेटीची माहिती दिलीय. यानंतर पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलंय.
हे पण वाचा: आपत्ती निवारणासाठी प्राथमिकता ठरवून नियोजन करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
हे पण वाचा: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महामारी काळात देशात सर्वात उत्तम काम केलं आहे.”
भागवत कराड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “पंकजा मुंडे (१२ जुलै) रोजी दिल्लीमध्ये बैठकीसाठी आल्या. त्यांची भेट घेतली. मन मोकळे झाले. मुंडे साहेबांची आठवण आवर्जून झाली. मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज ताई आहेत. त्यांनीही साहेबांच्या प्रमाणे शुभेच्छा दिल्या.”
आज @Pankajamunde ताई दिल्ली मध्ये बैठकीसाठी आल्या त्यांची भेट घेतली…मन मोकळे झाले..मुंडे साहेबांची आठवण आवर्जून झाली..मी मंत्री झालो मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज ताई आहेत..त्यांनीही साहेबांच्या प्रमाणे शुभेच्छा दिल्या..
— Dr Bhagwat Karad (@DrBhagwatKarad) July 12, 2021
हे पण वाचा: उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी माझ्यावर पाळत ठेवली; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
हे पण वाचा: गडकिल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती
राजीनामा सत्र सुरूच….
भाजप नेत्या पंकजा मुंडे समर्थकांचं राजीनामा सत्र अद्यापही थांबलेले नाही. पंकजा समर्थक आणि बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे ७७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन थेट मुंबईला रवाना झाले आहेत. उद्या मंगळवारी ते पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे उद्या पंकजा मुंडे यांनी समर्थकांच्या बोलावलेल्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हे पण वाचा: नितेश राणे यांच्याकडे जी प्रगल्भता, ती दुर्दैवाने शिवसेनेकडे नाही – आशिष शेलार
बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्यानं बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरूच आहे. जिल्ह्यात भाजप पदाधिकाऱ्यांत प्रचंड नाराजीचे सूर असून आणखीन राजीनामे येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा आशयाचं पत्र भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लिहिलं आहे. ७७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन जिल्हाध्यक्ष मस्के हे मुंबईकडे रवाना झाले आहेत.