पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आघाडीत बिघाड होईल, अशी वक्तव्ये सुरुच आहेत. नाना पटोले यांनी आता गंभीर आरोप केला आहे.
एकनाथ खडसे कधी सीडी लावताहेत याची वाट पाहतोय – राज ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच माझ्यावर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप केला आहे. नाना पटोले यांच्या नव्या आरोपांमुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यापासून महाविकास आघाडीत वक्तव्यांची मालिका सुरु झाली आहे. त्यामुळे सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.
‘नॉट रिचेबल’ असणाऱ्या नारायण राणेंचा अखेर फोन लागला; राज ठाकरेंनी मंत्रिपदासाठी दिल्या शुभेच्छा
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देतात. शिवसेनेला कामाला लागा म्हणतात. मुख्यमंत्र्यांनी असे आदेश दिलेले चालते. मी स्वबळाची भाषा बोलू लागलो, तर त्रास होतो. हे योग्य नाही. स्वबळाच्या घोषणेवर मी ठाम आहे”, असे मत त्यांनी मांडले.
भाई जगताप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करा – डॉ. अनिल बोंडे
पटोले म्हणाले की, “पुण्याचे पालकमंत्री बारामतीकर आहेत. अजित पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची काम करत नाहीत. यात संपर्कमंत्र्यांनी लक्ष घालावं असं आपण म्हणतो. पण, शेवटी त्यांचं ऐकायचं की नाही हेसुद्धा तेच ठरवतात”, अशी उघडपणे पटोलेंनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आघाडीत पुन्हा एकदा बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावरून हे सरकार पाच वर्ष पुर्ण करणार का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Read Also :
- पंतप्रधान मोदी स्टॅन स्वामींना स्वप्नात तरी घाबरले असतील का? राऊत यांच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर
- ‘नॉट रिचेबल’ असणाऱ्या नारायण राणेंचा अखेर फोन लागला; राज ठाकरेंनी मंत्रिपदासाठी दिल्या शुभेच्छा
- तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत; फडणवीसांचा गंभीर आरोप
- “सत्तेत काँग्रेसला कुणी विचारत नाही आणि काँग्रेसमध्ये नाना पटोलेंना!”
- संजय राठोड यांचं होणार पुनर्वसन? मंत्री मंडळातल्या प्रवेशाबद्दल म्हणाले…