औरंगाबाद : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड आणि महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले होते. मात्र, काही काळ राजकीय वर्तुळातून संन्यास घेतल्यानंतर, आता पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री संजय राठोड, हे बातम्यांमध्ये आले आहेत. पुन्हा एकदा त्यांचे मंत्री मंडळात कमबॅक होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेकडून ऑफर? उज्ज्वल निकम यांनी दिली प्रतिक्रीया
“संजय राठोड यांची कार्यपद्धती धडाक्याची आहे. अशा लोकांची सध्या गरज आहे. त्यामुळे, लवकरच ते मंत्रिमंडळात सामील होणार,” असा विश्वास काल उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याचा दौऱ्यादरम्यान माध्यमांशी साधलेल्या संवादात केला आहे.
सहकार हा विषय राज्य सरकारचाच, महाराष्ट्रात गंडांतर येणार नाही
त्यावर आता, औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेल्या संजय राठोड यांनी, प्रसार माध्यमांना सावध प्रतिक्रिया व्यक्त केली असून, “मी सध्या संभाजीनगरचा दौरा करत आहे. माझ्या समाजातील आणि भटक्या समाजातील बांधवाना भेटत आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करता आहे. मंत्रीपदाबाबद्दल मला काही बोलायचं नाही. मात्र माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील,” असं वक्तव्य करत कॅबिनेटमधील पुनरागमनावरच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
“गैरसमजात राहू नका, माझं तिकीट कुणीही कापू शकत नाही”
“सामंत यांनी माझ्या पुनरागमनाबाबत जी प्रतिक्रिया दिली आहे, ती मी ऐकली नाही. मात्र, ते माझे स्नेही आहेत. माझ्याबद्दल त्यांना जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, ते बोलले. ते जे बोलले त्याबद्दल त्यांनाच अधिक विचारलं पाहिजे. त्यावर मी काही बोलू शकत नाही,” असंही स्पष्टीकरण देत, भाजप नेत्यांनी यावर दिलेल्या प्रतिक्रियांवर बोलताना, “मी मंत्री व्हावं, ही माझ्या समाजाची अपेक्षा आहे,” असं त्यांनी सांगितलं आहे.
Read Also :
- “एकतर सगळे निर्बंध कायमचे काढून टाका किंवा संपूर्ण लॉकडाऊन करा!”
- भाजपला सर्वात मोठा धक्का! पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार, राजकीय चर्चेला उधान
- सोबत राहून पाठीत सुरा खुपसायचा आणि बोलायचे नाही; नाना पटोले यांची शिवसेना-राष्ट्रवादीवर टीका
- देश उलथवून टाकण्याच्या कटात हा ‘म्हातारा’ म्हणे सामील होता, कोणता देश? कोणाचा देश?
- आम्ही काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही, काँग्रेस नेत्यांची पवारांवर टीका