बारामती : नुकत्याच मोदी सरकारच्या झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराआधी, मोदी सरकारने नवीन स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाची स्थापना झाली. या नवीन मंत्रालयाचे पहिले मंत्री म्हणून अमित शहांनी शपथ घेतली.
“गैरसमजात राहू नका, माझं तिकीट कुणीही कापू शकत नाही”
दरम्यान, या नवीन सहकार मंत्रालयाच्या स्थापनेवरून राज्यात खळबळ उडालं असून, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून यावर सातत्याने टीका केली जात आहे. त्यातच आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली असून, केंद्राच्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रात गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही,” असं मत त्यांनी व्यक्त केले आहे.
“एकतर सगळे निर्बंध कायमचे काढून टाका किंवा संपूर्ण लॉकडाऊन करा!”
तसेच, “सहकार कायदे बनवण्याची जबाबदारी राज्य शासनाची. त्यानुसार महाराष्ट्राच्या विधानसभेने कायदे केलेत. विधानसभेने केलेल्या कायद्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही. केंद्र सरकार महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीवर गंडांतर आणेल या बातम्यांना फारसा अर्थ नाही. सहकार हा विषय घटनेनुसार राज्य सरकारचा आहे,” असा निर्वाळा माध्यमांशी संवाद साधताना दिला आहे.
भाजपला सर्वात मोठा धक्का! पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार, राजकीय चर्चेला उधान
यावेळी, “विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेस पक्षाकडेच राहील. आमचा तीन पक्षांचा निर्णय स्वच्छ झालाय. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबध नाही. तिन्ही पक्षांनाही काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे, त्या निर्णयावर कायम आहोत, असे त्यांनी सांगितले आहे.
Read Also :
- सोबत राहून पाठीत सुरा खुपसायचा आणि बोलायचे नाही; नाना पटोले यांची शिवसेना-राष्ट्रवादीवर टीका
- देश उलथवून टाकण्याच्या कटात हा ‘म्हातारा’ म्हणे सामील होता, कोणता देश? कोणाचा देश?
- आम्ही काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही, काँग्रेस नेत्यांची पवारांवर टीका
- भास्कर जाधवा यांच्या ‘त्या’ इच्छेला बाळासाहेब थोरातांचा ब्रेक, म्हणाले, ‘काँग्रेसमध्येही असे अनेक भास्कर जाधव!
- राहुल गांधींना राष्ट्रीय नेता बोलल्याचं बैलांना आवडलं नसेल; फडणवीसांची काँग्रेसवर खोचक टीका