पुणे: काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात मुंबईत आंदोलन केले होते. यावेळी काँग्रेस नेत्यांची चागलीच फजीती झाली होती. काँग्रेस नेत्याने इंधन दरवाढीविरोधात निषेध करण्यासाठी बैलगाडीतून आंदोलन करण्यात आले, तसेच यावेळी मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे.
हे पण वाचा: बैलगाडीवरून पडल्याने खिल्ली उडवणाऱ्या भाजपा नेत्यांना भाई जगताप यांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणतात…
हे पण वाचा: भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते बैलगाडीतून कोसळले; आंदोलनातच घडला प्रकार!
मात्र आंदोलनादरम्यान गाडी कोसळल्याने मोर्च्यात एकच गोंधळ उडाला. या घटनेवर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोलेबाजी केली. तुम्ही काँग्रेसच्या आंदोलनाचा व्हिडीओ लक्षपूर्वक ऐकला तर लक्षात येईल की, आंदोलनादरम्यान, काँग्रेसचे नेते देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो, अशा घोषणा देत होते. राहुल गांधी यांना राष्ट्रीय नेता म्हटल्याचं बैलांनाही आवडलेलं दिसत नाही. त्यामुळे ती बैलगाडी तुटली, असं ते चित्र आहे. पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.
हे पण वाचा: मनसेची ठरणार पुणे महापालिका निवडणुकीसाठी रणणीती; राज ठाकरे दोन दिवस पुण्यात मुक्कामी
हे पण वाचा: मुख्यमंत्री वारंवार सांगूनही ऐकत नसेल, तर मी मातोश्रीसमोर जाऊन बेशरमाचं झाड लावणार?
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षपदावरूनही महाविकास आघाडी सरकारची शेलक्या शब्दात फिरकी घेतली. भास्कर जाधव यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी शुभेच्छा आहेत. मात्र त्यांनी पदावर गेल्यावर किमान निष्पक्षपणे काम करावे अशी अपेक्षा आहे. तसेच त्या पदाची उंची वाढवण्यासाठी काम करावं. आघाडीमध्ये अध्यक्षपदावर जर एकमत असतं तर आतापर्यंत त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक घेतली असती. एकमत नाही म्हणूनच निवडणूक होत नाही.
हे पण वाचा: भाई जगतापांनी बोलून दाखवली खंत, या आघाडीत काँग्रेस ‘तिसराच’
ज्यांनी सहकार चळवळीमध्ये चुकीचे काम केलेत, सहकार बुडवला त्यांनाच या नव्या खात्यासंदर्भात भीती आहे. ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं आहे, त्यांनी नव्या सहकार खात्याचे स्वागतच केले आहे. अमित शहा खूप आधीपासून सहकार चळवळीत असून त्यांच्या राजकारणाची सुरुवातच सहकारातून झाली आहे, असे फडणवीस म्हणाले.
पूर्व विदर्भात ज्या तांदूळ घोटाळ्याचे आरोप होत आहेत, त्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत गेले आहेत. मध्यावधी निवडणुका होईल की नाही याचा निर्णय सरकारला करायचा आहे. मात्र ते तशी हिंमत करणार नाही; कारण त्यांना माहीत आहे, निवडणूक झाली तर महाविकास आघाडी सरकार कोसळेल. कारण या सरकारविरोधात लोकांमध्ये खूप नाराजी आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.