मुंबई : राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधल्या कुरबुरी, गेल्या काही दिवसांत बाहेर येऊ लागल्या आहेत. यातच आता तिन्ही पक्षांनी, आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांसाठी, पक्ष विस्तार करायला सुरुवात केली असून, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका, काँग्रेस स्वबळावर लढवणार, असे विधान केले आहे. तसेच, काँग्रेस हाच २०२४ मध्ये राज्यातील सर्वात मोठा पक्ष राहणार, असं भाकीत देखील त्यांनी केलं आहे. दुसरीकडे, भाजपने देखील स्वबळाचे नारे दिल्याने, आता एकटी पडलेली शिवसेना, राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
हे पण वाचा, मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा! अशोक चव्हाणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
यातच आता, परत एकदा मुंबईत काँग्रेसने स्वबळाचा सूर छेडला असून, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी, राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना, “काल-परवापर्यंत काँग्रेसची दखल लोक घेत होते. मात्र आता फक्त काँग्रेस काय करतेय हे बघत आहे. मग ते मुंबई असो की महाराष्ट्र. त्यामुळे, माझी पक्षश्रेष्ठींना विनंती आहे की, आम्हाला एकटं लढू द्या. तेव्हा बघुयात “किस मे है कितना दम”, असं म्हणत त्यांनी, “काँग्रेसची आजची राज्यातील परिस्थिती तुम्ही बघत आहात, आज काँग्रेसला ‘तिसरा पक्ष’ म्हणूनच संबोधले जाते,” अशी खंत बोलून दाखवली आहे.
हे पण वाचा, ‘आम्ही तेवढ्या एकाच कारणासाठी महाविकास आघाडीत सामील’- काँग्रेस
आज राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, भाजपला सोडचिठ्ठी देऊन सुनील देशमुख यांनी ‘घरवापसी’ केली. यावेळी भाई जगताप आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसने स्वबळावरच निवडणुका लढवाव्यात, असे मत व्यक्त केले. मात्र, काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात, या निर्णयावरून काँग्रेसमध्येच मतभेद आहेत. दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाणांनीही, “२०२४ मध्ये काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल,” असा दावा केला आहे. यावेळी, काँग्रेस सोडलेल्या नेत्यांना आता पश्चाताप होत आहे. ते हळूहळू घरवापसी करत आहेत. आता २०२४ मध्ये राज्यात काँग्रेसचाच मुख्यमंत्री विराजमान झाला पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांनी झटलं पाहिजे,” अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली आहे.
Read Also :
- राणे पिता-पुत्रांना बाळासाहेबांनी मोठे केले; काहीही बोलू नका आणि उपकार विसरू नका
- रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झडती घेणाऱ्या पाचही पोलिसांचे निलंबन मागे, गृहमंत्रालयाचे आदेश
- जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना १५ दिवस क्वारंटाईन करणार; अजित पवारांचा इशारा
- “अजित पवारांकडे १० सेकंद थांबून विचारपूस करायला देखील माणुसकी शिल्लक नाही”
- “आम्ही मराठी माणसाचा विषय कधीच सोडला नाही, त्यामुळे शिवसेना मराठी माणसाच्या मनात”