मुंबई : आज शिवसेनेचा ५५ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार-खासदार शिवसेनबद्दल, तसेच राज्यातल्या राजकारणाबद्दल व्यक्त होत आहेत. यावेळी शिवसेना नेते आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनी, राणे पिता-पुत्रांचा समाचार घेतला असून, निलेश आणि नितेश राणे काहीही करू शकत नाहीत. ते फक्त बोलतात. त्यांनी आपण कोणामुळे मोठे झालो आहोत, हे विसरू नये,” अशा शब्दांत राणे बंधूंना फटकारले आहे.
हे पण वाचा, “आम्ही मराठी माणसाचा विषय कधीच सोडला नाही, त्यामुळे शिवसेना मराठी माणसाच्या मनात”
तसेच, “ऐन निवडणुकीच्यावेळी नारायण राणेंनी शिवसेनेला सोडलं आणि ते काँग्रेसमध्ये गेले. त्यावेळी, आम्ही निलेश राणेंना दम भरला, सरकारी गाडी घेऊन ते फिरत होते. त्यांच्या विरोधात केसही टाकली गेली होती. त्यामुळे त्यांनी, आपण कुणामुळे मोठे झालो आहोत, हे विसरू नये, बाळासाहेबांमुळे तुमचे वडील मोठे झाले. काहीही बोलू नका आणि उपकार विसरू नका,” असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.
हे पण वाचा, मोदीनंतर उद्धव ठाकरे हाच एकमेव भारताला पर्याय – संजय राऊत
यावेळी, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि संपूर्ण वातावरण बदलले आहे. त्यांच्यामुळेच आपण महामारीवर मात केली आहे. महामारी काळात आघाडी सरकरने केलेल्या कामामुळेच जनता आत्ता बाहेर फिरू शकत आहे. मी आता जेव्हा मराठवाड्यात दौरे करतो. त्यावेळी जनता मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताना दिसते. विरोधी पक्ष काहीही बोलू देत, पण महामारीमध्ये जनतेचा जीव वाचवण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे,” असं त्यांनी सांगितलं.
हे पण वाचा, ‘… तर जिथल्या तिथे हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहणार नाही’, वर्धापनदिनी सेनेचा इशारा
“आम्ही कधीही हिंदुत्व विसरत नाही. हिंदुत्व आमचा श्वास आहे. आम्ही कधीही तो सोडणार नाही. शिवसेनाप्रमुखांचं हिंदुत्वाबद्दलचं मार्गदर्शन आणि त्यांचे विचार आमच्या मनात कोरले गेले आहेत,” असं सांगत त्यांनी, “शिवसेनेकडून राम मंदिराच्या कथित जमीन घोटाळ्यावर टीका केली गेलेली नाही. आम्ही फक्त सत्य बाहेर यावं अशी भूमिका मांडली. मी स्वत: राम मंदिरासाठी १ लाख १११ रुपयांची देणगी दिली आहे. पक्षाने १ कोटीचा निधी दिला आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
Read Also :
- रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झडती घेणाऱ्या पाचही पोलिसांचे निलंबन मागे, गृहमंत्रालयाचे आदेश
- जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना १५ दिवस क्वारंटाईन करणार; अजित पवारांचा इशारा
- “अजित पवारांकडे १० सेकंद थांबून विचारपूस करायला देखील माणुसकी शिल्लक नाही”
- भाजप-शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरूच, निलेश राणेंनी काढली शिवसेनेची लायकी, म्हणाले…
- फडणवीस १०० आमदार निवडून आणतात, बाळासाहेबांना ते का जमलं नाही? संजय राऊत म्हणतात…