मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापना केलेल्या शिवसेनेचा आज 55वा वर्धापन दिन असून, या निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनी, आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला, यावेळी, “बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेसाठी पाहिलेलं स्वप्न, आता शिवसेनेने पूर्ण केलं आहे. बाळासाहेबांच्याच विचारधारेवर शिवसेना पुढे जात आहे. आम्ही कधीच मराठी माणसाचा विषय सोडला नाही. त्यामुळे शिवसेना मराठी माणसाला महत्त्वाची वाटते, ती मराठी माणसाच्या मनात आहे,” अशी भावना त्यांनी बोलून दाखवली आहे.
हे पण वाचा, शिवसेना आमदाराची भन्नाट ऑफर, भाजपचं ओळखपत्र दाखवा आणि मोफत मिळवा पेट्रोल
तसेच, “एक छोटी संघटना म्हणून ५५ वर्षांपूर्वी शिवसेनेची सुरवात झाली. शिवसेना ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे. त्यामुळे, शिवसेना कधीही मुंबईच्या बाहेर, महापालिकेच्या बाहेर जाणार नाही, असं भाकीत केलं गेलं. पण, आज राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. किती आले आणि गेले, पण शिवसेना कायम आहे. शिवसेनेचा विचार कायम आहे. भारताच्या राजकारणात शिवसेना हा मोठा चमत्कार आहे,” असं संजय राऊत म्हणाले.
हे पण वाचा, ‘… तर जिथल्या तिथे हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहणार नाही’, वर्धापनदिनी सेनेचा इशारा
दरम्यान, “काहींनी ५-६ महिन्यांपूर्वी शिवसेना संपणार, असं म्हटलं होतं. पण, आज शिवसेना ५५ वर्षांची झाली आहे. आता राज्यभर शिवसेनेची पाळंमुळं घट्ट रोवली गेली आहेत. आता तर मुंबईच्या सीमा ओलांडून, ती देशात-केंद्रात गेली आहे. आज देशात शिवसेनचं महत्त्व कायम आहे,” असंही त्यांनी यावेळी सांगितलं. दुसरीकडे, सामनाच्या अग्रलेखातूनही आजच्या दिवसाचं औचित्य साधून भाष्य करण्यात आले आहे. “शिवसेना हीरक महोत्सव, अमृत महोत्सव, शतक महोत्सवही साजरा करेल, शिवसेनेची घोडदौड अशीच सुरू राहील, असे त्यात म्हटले आहे.
हे पण वाचा, मोदीनंतर उद्धव ठाकरे हाच एकमेव भारताला पर्याय – संजय राऊत
“महाराष्ट्रात आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेची सत्ता आहे, पण सत्तेचा ऊतमात ना शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांना चढला, ना आमच्या लाखो कडवट शिवसैनिकांना. पण कुणी विनाकारण अंगावर येऊन डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर ‘हर हर महादेव’चा गजर करीत जिथल्या तिथे हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहत नाहीत, असा इशाराच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.”
Read Also :
- फडणवीस १०० आमदार निवडून आणतात, बाळासाहेबांना ते का जमलं नाही? संजय राऊत म्हणतात…
- जितेंद्र आव्हाडांच्या खोचक शुभेच्छांना अण्णा हजारेंचे उत्तर, म्हणाले…
- ‘शिवसैनिकांचे राडे सुरूच राहिले तर…’, चंद्रकांत पाटलांचा इशारा
- शाब्बास रे वाघानो! शिवसैनिकांना भिडणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा नितेश राणेंकडून सत्कार
- भाजप-शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरूच, निलेश राणेंनी काढली शिवसेनेची लायकी, म्हणाले…