सिंधुदुर्ग : उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी बीड जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. हे नागरिक म्हणजे कंत्राटी परिचारक आणि परिचारिका होते. तसेच, मराठा आणि ओबीसी आंदोलकीदेखील यावेळी या जमावात होते. या सगळ्यांनी मिळून आपापल्या मागण्या घोषणाबाजी करत उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.
हे पण वाचा, भाजप-शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरूच, निलेश राणेंनी काढली शिवसेनेची लायकी, म्हणाले…
यावेळी, या जमावाने थेट उपमुख्यमंत्र्यांची गाडी अडवली, एवढेच नाही तर त्यांच्या गाडी समोर लोटांगण घातले. त्यामुळे, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांवर लाठीमार करावा लागला. तसेच, आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध करावे लागले. दरम्यान, यावर आता राज्यभरातून वेगवेगळ्या आणि संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, भाजपच्या नेत्यांनी देखील या घटनेचा निषेध करत, उपमुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे.
हे पण वाचा, ‘आंदोलन करायला भाजप आजही घाबरली नाही आणि उद्याही घाबरणार नाही’
भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करत या घडलेल्या प्रकारावरून उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला असून, “बीड मधे उपमुख्यमंत्री यांना आरोग्य कर्मचारी निवेदन देण्यासाठी गेलेल्या महिलाना काय वागणूक मिळाली बघा. अजित पवारांनी ‘Guard of honour’ पावसामुळे नाकारला म्हणून त्यांचं काही मिडीयावाले कौतुक करतायत पण अजित पवारांकडे 10 सेकंड थांबून विचारपूस करायला जी माणुसकी लागते ती सुद्धा नाही”, असा घणाघात त्यांनी केला आहे.
बीड मधे उपमुख्यमंत्री यांना आरोग्य कर्मचारी निवेदन देण्यासाठी गेलेल्या महिलाना काय वागणूक मिळाली बघा. अजित पवारांनी 'Guard of honour' पावसामुळे नाकारला म्हणून त्यांचं काही मिडीयावाले कौतुक करतायत पण अजित पवारांकडे 10 सेकंड थांबून विचारपूस करायला जी माणुसकी लागते ती सुद्धा नाही. pic.twitter.com/GudrUCfrcg
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 18, 2021
हे पण वाचा, शाब्बास रे वाघानो! शिवसैनिकांना भिडणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा नितेश राणेंकडून सत्कार
दरम्यान, पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला असता, दोन महिला कर्मचारी जखमी झाल्या असून, या सगळ्या प्रकारावर भाजप नेत्या, पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली असून, ‘हा सगळा प्रकार संतापजनक असल्याचे आणि ज्यांची जबाबदारी होती ते कमी पडले,’ असल्याची भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. तसेच, ‘स्वतःच्या जिल्ह्यात उपमुख्यमंत्री आलेत, तेव्हा उपमुख्यमंत्र्यांना इथल्या लोकांना भेटवणं, त्यांच्या समस्या जाणून घ्यायला लावणं, हे स्थानिक नेत्यांचं काम आहे,’ असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे धंनजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.
Read Also :
- अजित पवारांनी केली बीड जिल्ह्याच्या मुख्याधिकाऱ्यांची खरडपट्टी, म्हणाले…
- बीडने दाखवली उपमुख्यमंत्र्यांसमोर नाराजी; जमावाने अडवला ताफा, तर इसमाने घातला राडा
- “आम्ही मराठी माणसाचा विषय कधीच सोडला नाही, त्यामुळे शिवसेना मराठी माणसाच्या मनात”
- फडणवीस १०० आमदार निवडून आणतात, बाळासाहेबांना ते का जमलं नाही? संजय राऊत म्हणतात…
- ‘… तर जिथल्या तिथे हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहणार नाही’, वर्धापनदिनी सेनेचा इशारा