वर्धा : अयोध्येतील राम मंदिराच्या जमीन खरेदीत कथित घोटाळा झाल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते मुंबईत एकमेकांना भिडले होते. यावरून भाजप नेत्यांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना संजय राऊत यांनी भाजपला उत्तर देऊ म्हटलं होतं. यावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आम्ही आंदोलनं करूच. उत्तर देण्याची वाट कसली बघताय?. भाजप आंदोलन करायला आजही घाबरली नाही आणि उद्याही घाबरणार नाही, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.
भाजप आंदोलन करायला आजही घाबरली नाही आणि उद्याही घाबरणार नाही. मंत्र्यांना अश्या पद्धतीने बोलावं लागत आणि सामान्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत आहे, याच आत्मपरीक्षण शिवसेनेनं करावं, असा सल्ला शेलार यांनी शिवसेनेला दिला. ते वर्ध्यात बोलत होते.
रामाला आणि राम मंदिराला बदनाम करण्याचं काम शिवसेनेकडून होत असेल तर लोकशाही मार्गाने आंदोलन होईल. ते करायचा आमचा अधिकार आहे आणि कार्यकर्ते ते करतील. सत्ताधारी एवढे घाबरतात हा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.
Read Also :
- ‘शिवसैनिकांचे राडे सुरूच राहिले तर…’, चंद्रकांत पाटलांचा इशारा
- शाब्बास रे वाघानो! शिवसैनिकांना भिडणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा नितेश राणेंकडून सत्कार
- ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचे निधन
- पुण्यात पुन्हा विकेंड लॉकडाऊन, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद
- ‘पंतप्रधानांचाच वारसा जपत भाजपने पुणे महापालिकेच्या प्रॉपर्टी विकण्याचा सपाटा लावला आहे’