नवी दिल्ली : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मिल्खा सिंग यांना 19 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. परंतु, अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना चंदीगढच्या PGI रुग्णालयत भरती करण्यात आले.
पाच दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचं निधन झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील निधनानंतर दु:ख व्यक्त केले. मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे आपण महान खेळाडूला मुकलो आहोत. त्यांनी देशाच्या असंख्य नागरिकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं होतं, असं नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्यासारखं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून निघून जाणं हे फार दुख:द आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
मिल्खा सिंग हे अॅथलेटिक्समध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे पहिले खेळाडू होते. मिल्खा सिंह 1960 साली रोम ऑलिम्पिकमध्ये झालेल्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आले होते. 1958च्या कार्डिफ कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
Read Also :
- पुण्यात पुन्हा विकेंड लॉकडाऊन, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद
- ‘पंतप्रधानांचाच वारसा जपत भाजपने पुणे महापालिकेच्या प्रॉपर्टी विकण्याचा सपाटा लावला आहे’
- ‘तो दिवस लांब नाही ज्या दिवशी शिवसेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील’
- ‘संपूर्ण शिवसेनाच आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार ?’
- ‘तुम्हाला भंडाऱ्यात बसवण्याची व्यवस्था करू’, दरेकरांचे राऊतांना जोरदार प्रत्युत्तर