मुंबई : यावर्षी सुद्धा आषाढी वारी पालखी सोहळ्यावर कोरोना व्हायरस महामारीचे संकट आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने वारीसाठी काही नियमावली जारी केली असून, मानाच्या 10 पालख्यांना बसने नेण्याची परवानगी दिली आहे. यावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली जात आहे.
भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेवर टीका केली आहे. ‘उध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार ?, अशी टीका तुषार भोसले यांनी केली आहे.
उध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता 'पवार'करी झाल्याने त्यांना 'वारकरी' कसा दिसणार ?
म्हणुनच तर वारी विषयी शिवसेनेने अद्याप चकार शब्द काढलेला नाही !@OfficeofUT @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra pic.twitter.com/HvqPL9N2ke— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) June 17, 2021
ज्या शिवसेनेला महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेला पंढरपुरचा विठ्ठलच मान्य नाही ते पंढरीच्या वारीविषयी भूमिका घेऊ शकत नाही यावर शिक्कामोर्तब झालायं, असे तुषार भोसले म्हणाले.
दरम्यान, यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर पायी वारीला परवानगी देण्यात आली नाही. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरित आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल.
Read Also :
- ‘तुम्हाला भंडाऱ्यात बसवण्याची व्यवस्था करू’, दरेकरांचे राऊतांना जोरदार प्रत्युत्तर
- ‘…म्हणून रामभक्तांनी एक अराजकीय समिती तयार करावी’
- विनामास्कचा दिसेल त्याचं तिकीट कट होणार – सुप्रिया सुळे
- ‘पाच पिढ्यांची शरद पवारांनी माती केली, आता पुढच्या पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल’
- नाना पटोले राहुल गांधींना देणार ‘बर्थ डे गिफ्ट’, भाजप नेते काँग्रेसच्या वाटेवर ?