मुंबई : राममंदिरासाठीच्या जमीन हस्तांतरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘राम मंदिर उभारणीसाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतोय की नाही, हे पाहण्यासाठी देशातील रामभक्तांनी अराजकीय अशी एक समिती तयार करावी’, असे आवाहन केले आहे.
राममंदिराच्या जमीन हस्तांतरणात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखात याबाबत भाष्य करण्यात आले होते. त्यानंतर यावरून शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले होते. याबाबत विचारले असताना त्यांनी अराजकीय समिती तयार करण्याचे आवाहन केले.
या समितीने कायम राममंदिर उभारणीतील खर्च, जमाखर्च आणि त्याचा हिशोब हा त्रयस्थ समितीच्या निरीक्षणाखाली ठेवावा. कारण रामभक्तांची अपेक्षा आहे की, प्रामाणिकपणे मंदिराचं पावित्र्य राखून राम मंदिर उभं राहावं, असे ते म्हणाले.
राममंदिर उभारणीत गोळा होणार्या निधीत भ्रष्टाचार होत असेल तर हे दुदैव आहे. राम मंदिर बांधताना हे लोक भ्रष्टाचार करत असतील तर राम यांच्यापासून किती लांब आहे आणि रामापासून हे किती लांब आहेत हे स्पष्ट होते. रामाचा फायदा घेऊन कसे वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय फायदे आणि आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत हे यानिमित्ताने समोर आले आहे, अशी टीका त्यांनी केली.
Read Also :
- विनामास्कचा दिसेल त्याचं तिकीट कट होणार – सुप्रिया सुळे
- ‘पाच पिढ्यांची शरद पवारांनी माती केली, आता पुढच्या पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल’
- नाना पटोले राहुल गांधींना देणार ‘बर्थ डे गिफ्ट’, भाजप नेते काँग्रेसच्या वाटेवर ?
- मराठा आरक्षण : प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश; समन्वयासाठी समितीही नेमा – उद्धव ठाकरे
- ‘राज्य सरकार मागण्यांबाबत सकारात्मक, मात्र अद्याप आंदोलन स्थगित झालेलं नाही’