मुंबई : मराठा आरक्षणाच्या संदर्भातील मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संभाजीराजे यांच्या बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी सरकार मागण्यांबाबत सकारात्मक असल्याची माहिती दिली. या बैठकीत समाजातील निवडक जणांची एक समिती नेमून त्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेले समाजाचे प्रमुख प्रश्न लगेच सोडविण्यासाठी समन्वयाने काम करू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
सरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला ?त्यापेक्षा आपण आजच्यासारखं एकत्र बसून खासदार संभाजीराजे यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढू. सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही. तसेच ज्या ज्या विभागात प्रश्न प्रलंबित आहे त्यांच्याकडे तातडीने पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यात येतील, असा विश्वास त्यांनी दिला.
मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य शासनाकडे प्रलंबित विषयावर लवकरच खातेनिहाय आढावा बैठक घेऊ. तसेच, कोपर्डी खटला जलद गतीने चालविण्यासाठीची विनंती आणि आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका लवकरच दाखल करणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दुर्दैवी असला तरी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेले सर्व विषय सोडविणार आहे. मराठा समाजासाठीच्या योजनांसाठी निधीची अडचण येऊ देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
Read Also :
- ‘राज्य सरकार मागण्यांबाबत सकारात्मक, मात्र अद्याप आंदोलन स्थगित झालेलं नाही’
- ‘मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणी अटक झालेल्या सगळ्यांचे ‘गॉडफादर’ उद्धव ठाकरे?’
- एनआयए कडून एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना अटक, आजच सेशन कोर्टात हजर करणार
- एनआयए कडून एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना अटक, आजच सेशन कोर्टात हजर करणार
- अनिल देशमुखांना धक्का! महत्त्वाची कागदपत्रे हाती, ईडीने नागपूरमध्ये केली 3 जणांची गुप्त चौकशी