मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलीया स्फोटकं प्रकरणात प्रमुख संशयित असलेले सचिन वाझे या दोन्ही प्रकरणात आत्तापर्यंत ८ जणांना अटक झाली असून, आता यात एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा देखील क्रमांक लागला आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापू लागले असून, ‘अटक झालेल्या आणि चौकशी होत असलेल्या सगळ्यांचीच नावे शिवसेनेशी कशी जोडली जात आहेत? सचिन वाझेंचे गॉडफादर कलानगरमध्ये बसलेले आहेत काय?, असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
हे पण वाचा, “आम्ही शिवसेनेचं अस्तित्व संपवल्याशिवाय राहणार नाही” – चंद्रशेखर बावनकुळे
नितेश राणे आज एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते, यावेळी त्यांनी, ‘अटक होत असलेल्या आणि चौकशी होणाऱ्या सगळ्यांचीच नावे शिवसेनेशी कशी जोडली जात आहेत? या सगळ्यांमध्ये ‘शिवसेना’ हीच एक कॉमन लिंक आहे. या सगळ्यांचे, वाझेंचे ‘गॉडफादर’ कलानगरमध्ये बसले आहेत काय?, सगळ्या संशयाच्या सुया त्याच दिशेनं जात आहेत. त्यामुळे, एनआयएने थेट कलानगरमधून चौकशीला सुरुवात करावी,’ अशी मागणी त्यांनी एनआयएला केली आहे.
How come every one who r either gettin arrested or investigated in the Antilia n Hiren murder case are directly or indirectly related to shiv Sena?
Can’t be a coincidence!!
And we still wondering who their godfather is??!!
It’s Uddhav Thackeray.— nitesh rane (@NiteshNRane) June 17, 2021
तसेच, ‘वाझेंचे बॉस हे अनिल परब असून, ते वाझेंसाठी अधिवेशनात भांडत होते. मुख्यमंत्री देखील वाझेंची बाजू घेत होते. ‘वाझे काय लादेन आहे का?’ असं वक्तव्य देखील त्यांनी केलं. हिरेन प्रकरणी अधिवेशनात बोलताना, ‘आम्हाला काय करायचं ते आम्ही करूच. ज्या गोष्टी करणं गरजेच्या आहे, त्या करणारच,’ असं त्यांनी सांगितलं,’ या सगळ्यामुळे या सगळ्याचे मुख्य आरोपी कलानगरात आहेत. तिथेच हेडक्वॉर्टर आहे,’ असा दावा त्यांनी केला आहे.
हे पण वाचा, राष्ट्रवादीने मिळवला शिवसेनेच्या सूरात सूर! भाजप-काँग्रेसला ‘आऊट’ करण्यासाठी नवीन आघाडी उदयास येणार?
यावेळी त्यांनी, शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवनासमोर जुंपली, त्यावरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, ‘शिवप्रसाद देणाऱ्यांनी कधीतरी घराबाहेरही यावं.. त्या ऑफिसमधून बाहेर येऊन मैदानात यावं. नारायण राणेंनी शिवसेना सोडली, तेव्हा संजय राऊतांची काय अवस्था झाली होती, हे वेगळं सांगायला नको. त्यामुळे, राऊतांनी शिवभोजनाची भाषा करू नये. बाहेर आल्यावर ते दोन पायांवर जाणार नाहीत, हे मी ठामपणे सांगतो,’ असा थेट इशारा त्यांनी राऊतांना दिला आहे.
Read Also :