मुंबई : देशात सध्या राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणावरून राज्यातदेखील राजकारण चांगलेच तापले आहे. या जमीन खरेदीबाबत संजय राऊत यांनी, सामानातून केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपवरून भाजप संतापली असून, भाजप-शिवसेनेमध्ये यावरून काल शिवसेना भवनासमोर खडाजंगी झाली. त्यानंतर आता या दोन्ही पक्षात राजकीय वाकयुद्धाला सुरवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
हे पण वाचा, ‘कुठे बाळासाहेबांची शिवसेना, कुठे सत्तेपाई सत्व गमावलेली ही शिवसेना’
सकाळी संजय राऊत यांनी भाजपवर शब्दांची तोफ डागल्यावर, आता महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. “आता आम्ही निदर्शनेदेखील करायची नाहीत का?, रोषदेखील व्यक्त करायचा नाही का? एकीकडे तुम्ही दररोज सामनातून अग्रलेख लिहिणार आणि भाजपला वाटेल त्या भाषेत बोलणार, त्याला ना कसला आधार ना काही पुरावा,” अशी टीका त्यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेवर केली आहे.
हे पण वाचा, “शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा…”
तसेच, “रीतसर परवानगी काढून आमच्यकडून २० कार्यकर्ते निदर्शने करत होते. त्यांच्या हातात दगड-धोंडे नव्हते. त्यांच्या हातात काहीही नव्हते. पण, तरीही त्यांना निदर्शने करून दिली नाही आणि पोलिसांनी अटकदेखील केली. काही दिवसांपूर्वी आमच्या भाजप कार्यालयाबाहेर देखील १५ दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली. तेव्हा, शिवसेनाच काय, काँग्रेसनेही आमच्या कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काय आम्ही मारामाऱ्या केल्या का? त्यावेळी त्यांनी काही वेळ निदर्शने केली आणि पोलिस त्यांना घेऊन गेले,” असं सांगत त्यांनी आमच्यावर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली.
प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचा पत्रकारांशी संवाद https://t.co/lzH8bnVrG5
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 17, 2021
यावेळी, ‘हे आम्ही खपवून घेणार नाही. राममंदिर हा काही भाजपा, विश्व हिंदू परिषद किंवा ट्रस्टचा विषय नसून, तो संपूर्ण देशाचा आणि समस्त हिंदूंचा विषय आहे. त्यावर आम्हाला व्यक्त व्हावंसं वाटतं आणि तुम्हाला वाटत नाही. तुम्ही जिथे हिंदुत्व सोडलं, तिथंच आपल्यात अंतर निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे, तुमचं हिंदुत्व खोटारडं आहे, असचं आम्ही म्हणणार. मंदिराचं काम अतिशय मेहनतीने केलं जात आहे. पण यात काँग्रेस आणि देशविरोधी ताकदीकडून रोज नवीन मुद्दे उकळले जात आहेत,’ असा घणाघात त्यांनी केला आहे.
Read Also :
- महाराष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येणार?
- लपून-छपून हल्ला करून शिवसेनेने आपली ‘औरंगजेबी’ वृत्ती दाखवली
- “लपत छपत महिलेवर हात उचलण्यात कसला आलायं पुरूषार्थ? सुभेदाराची सून आठवा आणि तुमचे प्रताप बघा.”
- ‘शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलाय, आता…’ संजय राऊत यांनी दिला भाजपला थेट इशारा
- भाजप-शिवसेना वाद : किशोरी पेडणेकरांकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्वीट, व्हिडीओत बाळासाहेब म्हणत आहेत…