मुंबई : गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघातून महायुतीकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी घोषीत केली आहे. याठिकाणी भाजपकडून मंत्री मंगलप्रभात लोढा, तसेच मिलिंद नार्वेकर यांचं नाव चर्चेत होतं. मात्र शिवसेना शिंदे गटाकडून आता यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे याठिकाणी आता यामिनी जाधव विरूद्ध ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांच्यात थेट लढत होणार आहे.
हेही वाचा…“आज भारत जगाला मदत करतो, कुणाकडून भीक मागत नाही”, मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल
अलिकडेच ठाण्यातील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यामिनी जाधव यांनी भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी जवळपास दीड तास चर्चा केली होती. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयामार्फत यामिनी जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यांचा सामना आता अरविंद सावंत यांच्याशी होणार आहे. यातच आता याठिकाणी काय राजकीय घडामोडी घडणार ते पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात राहुल नार्वेकर यांची ताकद देखील मोठी आहे. तर मंगलप्रभात लोढा देखील याच मतदारसंघातून येत आहेत. त्यामुळे यामिनी जाधव यांना विजयी करण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जाणार अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“सुनेत्रा पवारांचा पायगुण चांगला, आताच तर इतकं, तर खासदार झाल्यात तर काय होईल विचार करा,”
हेही वाचा…“आढळरावांनी वाडा गावच्या विकासासाठी विविध प्रकारचा निधी पोहोचवला”
हेही वाचा…“आढळरावांच्या भव्य रॅलीला हडपसरमधील हजारो नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद”
हेही वाचा….“सत्ता एकदा डोक्यात शिरली, की ती..,” शरद पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल