मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याची तारिख जवळ येत आहे. मात्र महायुतीत मुंबईतील मतदारसंघातील तिढा अद्यापही सुटलेला नाहीय. अशातच आता दक्षिण मुंबईच्या जागेवरील भाजपने आपला दावा कायम ठेवला असून याठिकाणी अर्ज भरण्याची ३ मे रोजी शेवटची तारीख आहे. यातच आता भाजपकडून मंगलप्रभात लोढा यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईतील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीत हा मतदारसंघ शिंदेंच्या ताब्यात आहे. मात्र यावर भाजपने मोठा दावा सांगितला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून या मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळेच याठिकाणी अद्यापही महायुतीचा उमेदवार घोषीत करण्यात आलेला नाहीय.
हेही वाचा…“शरद पवार महाराष्ट्राचा आत्मा, हे मोदीला ४ जुनला कळून येईल,” शरद पवार गटाचा मोदींवर पलटवार
अशातच भाजपकडून मंगलप्रभात लोढा यांनी आज उमेदवारी अर्ज खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जर महायुतीत हा मतदारसंघ भाजपला सुटला तर याठिकाणी त्यांचा सामना ठाकरे गटातील अरविंद सावंत यांच्यासोबत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांचा सामना वकिल उज्वल निकम यांच्यासोबत होणार आहे. याठिकाणी भाजपने विद्यमान खासदार पुनम महाजन यांचा पत्ता केला आहे. तर कल्याणमधून आज ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“आढळरावांच्या भव्य रॅलीला हडपसरमधील हजारो नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद”
हेही वाचा….“सत्ता एकदा डोक्यात शिरली, की ती..,” शरद पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल
हेही वाचा…“आज भारत जगाला मदत करतो, कुणाकडून भीक मागत नाही”, मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल