पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे लोकसभेच्या उमेदवारांसाठी सभा पार पडली. या सभेतून मोदींनी कॉंग्रेससह महाविकास आघाडीवर देखील जोरदार टिका केली. तर शरद पवार यांचा भटकता आत्मा असा उल्लेख करत जोरदार टिका केली. त्यावर आता शरद पवार गटाकडून मोदींना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यावरूनच शरद पवार गटातील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींवर घणाघात केलाय.
हेही वाचा….शिरूरमध्ये ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, आढळराव पाटील अन् कोल्हेंमध्ये प्रमुख लढत
ही निवडणूक खुप वेगळी आहे, सत्ताधाऱ्यांना ऐनकेन प्रकारे ही निवडणूक जिंकायची आहे. म्हणून साम दाम दंड भेद सर्व गोष्टींचा वापर होत आहे. त्यांच्या घौडदौडीला शरदचंद्र पवार साहेब लगाम लावत आहेत. म्हणून ते सतत पवार साहेबांवर टीका करत आहेत. आता काही वेळापूर्वी पंतप्रधान मोदींची सभा झाली. त्या सभेत त्यांनी पवार साहेबांना आत्म्याची उपमा दिली. पण नरेंद्र मोदी यांना ४ जूनला मतमोजणीनंतर लक्षात येईल की, पवार साहेब महाराष्ट्राचा आत्मा आहे. असा इशाराही त्यांनी दिला.
तर पवार साहेबांवर बोलण्याव्यतिरिक्त या पंतप्रधानांना काहीच जमत नाही. आपले काम सांगायचे तर पंतप्रधान जाईल तिथे विरोधकांवर टीका करत आहेत. आम्ही अनेक पंतप्रधान पाहिले पण कोणत्याही पंतप्रधानाने विरोधकांवर अशी टीका केली नाही. हे नरेंद्र मोदी यांना शोभतंय अस वाटत नाही. ४०० पार करू असे सांगणाऱ्या नरेंद्र मोदींच्या तोंडून आता ४०० हा शब्द देखील निघत नाही. कारण त्यांना कळून चुकले आहे की, त्यांच्या आता २०० वरही जागा येत नाही. असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा…“महाविकास आघाडीचा उमेदवार खोटारडा, मतदारांनी भूलथापांना बळी पडू नये:” धनंजय सावंत
दरम्यान, शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले? हा प्रश्न महाराष्ट्रात येऊन अमित शहाने आम्हाला विचारू नये. त्यांनी गुजरातमध्ये काय केले हे सांगावे. देशातील जनता भारतीय जनता पक्षाच्या धोरणांवर इतके नाराज आहेत की, लोक भाजपच्या कार्यकर्त्यांना, उमेदवारांना गावात फिरू देत नाहीत. असा पलटवार देखील जयंत पाटलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केला.
तर सुप्रिया ताईंना तुम्ही गेली १०-१५ वर्ष सतत निवडून देत आहात आणि सुप्रिया ताईही तुमचे प्रश्न अत्यंत तळमळीने संसदेत मांडतात. प्रश्न संसदेत मांडले की सुटतात. त्याची नोंद घेतली जाते आणि प्रश्न सोडवणुकीस गती येते. आपला खासदार बोललाच पाहिजे. आपल्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी आपण सुप्रिया ताईंना निर्भीडपणे मतदान करा. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
READ ALSO :
हेही वाचा…“अमोल किर्तीकरांशी लढताना ‘गजानन किर्तीकर’ वायकरांची साथ देतील की पोटच्या पोराची ?
हेही वाचा….“अजितदादा विकासकामे खेचून आणतील, त्यासाठी सुनेत्रा पवारांना खासदार करा”
हेही वाचा…“उध्दव ठाकरे, अन् अनंत गीते यांनी सीएए कायदा काय आहे ? हे जनतेला सांगावे”, तटकरेंनी डिवचलं
हेही वाचा…“लोकसभेची निवडणुक ही तटकरे विरुद्ध गीते एवढी सिमीत नाही तर..” तटकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा….“नरेंद्र मोदी शरद पवारांच्या मृत्यूची वाट पाहत नाहीत ना ? “