रायगड : सामाजिक सलोखा ज्यांना बघवत नाही ते धर्माधर्मांत, जातीजातींमध्ये मतांच्या बेगमीसाठी अंतर निर्माण करत आहेत. अयोध्येत राममंदिर झाले. त्याचसोबत अयोध्येत मशीदचेही काम सुरू आहे, हे कधी ते लोक सांगत नाहीत. मात्र मुस्लिम समाजाच्या मतांसाठी व्हॉटसअपच्या माध्यमातून मेसेज केले जातात. सामाजिक सामंजस्य जपणारे आम्ही आहोत. परंतु कुणी कुणाच्या नावाने दंगा करण्याचा प्रयत्न करतील तर त्यांचे धंदे काढायला मला वेळ लागणार नाही असं म्हणत रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांच्यावर जोरदार टिका केली. ते महाड येथे प्रचार सभेत बोलत होते.
हेही वाचा…महाराष्ट्रात अनेक अतृप्त आत्मे फिरत आहे,” नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा
पुढे बोलतांना ते म्हणाले की, फाळणी होत असताना शेजारच्या देशात गेले. त्यांना मातृभूमीत परत यायचे असेल तर त्यांच्या वास्तव्याची अट शिथिल केली, हा सीएएचा कायदा आहे. या देशातील राष्ट्रभक्त मुस्लिमांमध्ये चुकीचे काही घडणार नाही. असं म्हणत उध्दव ठाकरे, अनंत गीते यांना की त्यांनी सीएए कायदा काय आहे. हे जनतेला सांगावे. पण समाजासमाजात जाणीवपूर्वक अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न ही जातीयवादी मंडळी करत आहे. व्हॉटसअप मेसेजच्या निमित्ताने आमच्यामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करत असेल, तर या परिसरातील, देशातील, राज्यातील मुस्लिम समाजाने आमचा धर्मनिरपेक्ष विचार बघावा, असे आवाहनही त्यांनी उद्धव ठाकरे यांना केलं.
हेही वाचा…नगरमध्ये मोठा उलटफेर, वंचितसह MIM , अपक्ष उमेदवार निलेश लंकेंची माघार
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समानता दिली. त्यामुळेच या देशामध्ये लोकशाही व्यवस्था जिवंत आहे. देशामध्ये स्थैर्य आणि अस्थैर्य कसे होते याचे उदाहरण देत असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या या राजधानीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक हूंकार महाडच्या नगरीमधून दिला तिथे सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम होत आहे, असेही सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“लोकसभेची निवडणुक ही तटकरे विरुद्ध गीते एवढी सिमीत नाही तर..” तटकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा….“नरेंद्र मोदी शरद पवारांच्या मृत्यूची वाट पाहत नाहीत ना ? “
हेही वाचा….शिरूरमध्ये ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, आढळराव पाटील अन् कोल्हेंमध्ये प्रमुख लढत
हेही वाचा…“महाविकास आघाडीचा उमेदवार खोटारडा, मतदारांनी भूलथापांना बळी पडू नये:” धनंजय सावंत